शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

हडकाईचोंड येथे ५५१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:10 IST

आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही  काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.

सुरगाणा : आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही  काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.  सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेवरील हडकाईचोंड येथे स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था व बिरसा मुंडा प्रतिष्ठान समिती यांनी आयोजित केलेल्या ५५१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळ्यात सावरा बोलत होते.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जिवा पांडू गावित, माउली धाम त्र्यंबकेश्वर रघुनाथ महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आयोजक भरत भोये, वनवासी कल्याण आश्रमचे क्षेत्रीय मंत्री संजय कुलकर्णी, समीर चव्हाण, एन.डी. गावित, रामजी गावित, रमेश थोरात, सुरगाणा नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी, रतन चौधरी, भरत कोल्हे, विजय कानडे, सदू गांगुर्डे, विजय कानडे, विजय पवार, रोशन पगारे, राहुल अहेर, धर्मेंद्र पगारिया, ललित चव्हाण, राहुल अहेर, राकेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टाळू आहे. गरीब आहे. लग्न, आजारपण हे टाळता येत नाहीत म्हणून खर्च कमी होण्याकरिता सर्वच समाजात सामुदायिक विवाह ही अत्यंत काळाची गरज बनली आहे.  महामंडलेश्वर रघुनाथ महाराज यांनी प्रत्येक समाजाने आदिवासी समाजाकडून राष्ट्रीय एकात्मता शिकावी, आदिवासी म्हणजे आदि वंश हा वंश महादेवाचा आहे. या समाजाने विकासाकरिता कोणावरही  अवलंबून राहता कामा नये, असे आवाहन केले. सोहळ्यात ५५१ हापूस आंब्याच्या कलमी रोपांचे वाटप वनविभागातर्फे करण्यात आले. सोहळ्यास गुजरात, डांग, धरमपूर, दादरा नगर हवेली, दिव दमण, बलसाड या भागातील पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थिती होते.  यावेळी शांताराम महाले, सुभाष भोये, रमेश वाडेकर, विजय थविल, अजित सहारे, गुलाब पवार, ईश्वर भोये, रवि भोये, सादू भोये, वसंत पवार, उमेश पालवा, चंदू ठाकरे, दीपक पवार, दीपक मेघा, रमेश बागुल उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक