शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

हडकाईचोंड येथे ५५१ जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:10 IST

आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही  काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.

सुरगाणा : आदिवासी समाजात वर्षानुवर्ष गरिबी आहे. पावसाळ्यात काम संपले की, कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाच्या पालन-पोषणाकरिता घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील. खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळा ही  काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले.  सुरगाणा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेवरील हडकाईचोंड येथे स्वामी विवेकानंद बहुद्देशीय सेवाभावी संस्था व बिरसा मुंडा प्रतिष्ठान समिती यांनी आयोजित केलेल्या ५५१ आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळ्यात सावरा बोलत होते.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जिवा पांडू गावित, माउली धाम त्र्यंबकेश्वर रघुनाथ महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आयोजक भरत भोये, वनवासी कल्याण आश्रमचे क्षेत्रीय मंत्री संजय कुलकर्णी, समीर चव्हाण, एन.डी. गावित, रामजी गावित, रमेश थोरात, सुरगाणा नगराध्यक्ष रंजना लहरे, सुरेश गवळी, रतन चौधरी, भरत कोल्हे, विजय कानडे, सदू गांगुर्डे, विजय कानडे, विजय पवार, रोशन पगारे, राहुल अहेर, धर्मेंद्र पगारिया, ललित चव्हाण, राहुल अहेर, राकेश शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टाळू आहे. गरीब आहे. लग्न, आजारपण हे टाळता येत नाहीत म्हणून खर्च कमी होण्याकरिता सर्वच समाजात सामुदायिक विवाह ही अत्यंत काळाची गरज बनली आहे.  महामंडलेश्वर रघुनाथ महाराज यांनी प्रत्येक समाजाने आदिवासी समाजाकडून राष्ट्रीय एकात्मता शिकावी, आदिवासी म्हणजे आदि वंश हा वंश महादेवाचा आहे. या समाजाने विकासाकरिता कोणावरही  अवलंबून राहता कामा नये, असे आवाहन केले. सोहळ्यात ५५१ हापूस आंब्याच्या कलमी रोपांचे वाटप वनविभागातर्फे करण्यात आले. सोहळ्यास गुजरात, डांग, धरमपूर, दादरा नगर हवेली, दिव दमण, बलसाड या भागातील पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थिती होते.  यावेळी शांताराम महाले, सुभाष भोये, रमेश वाडेकर, विजय थविल, अजित सहारे, गुलाब पवार, ईश्वर भोये, रवि भोये, सादू भोये, वसंत पवार, उमेश पालवा, चंदू ठाकरे, दीपक पवार, दीपक मेघा, रमेश बागुल उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक