बोेगस लाभ घेणार्‍या भुसारेंची चौकशी व्हावी : सुधाकर राऊत

By Admin | Updated: May 30, 2014 01:05 IST2014-05-30T00:12:06+5:302014-05-30T01:05:04+5:30

नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बनावट कागदपत्रे देऊन घेणार्‍या शशिकांत भुसारे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.

Should be investigated for land grabbing benefit: Sudhakar Raut | बोेगस लाभ घेणार्‍या भुसारेंची चौकशी व्हावी : सुधाकर राऊत

बोेगस लाभ घेणार्‍या भुसारेंची चौकशी व्हावी : सुधाकर राऊत

नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बनावट कागदपत्रे देऊन घेणार्‍या शशिकांत भुसारे यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.
पेठ तालुक्यातील कोटंबी ग्रामपंचायतीत सदस्य असलेल्या देवता सुधाकर राऊत यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना, निर्मल ग्राम उभारणीसाठी साडेचार हजार रुपयांचे अनुदान घेऊन शासकीय लाभ घेतल्याने देवता सुधाकर राऊत यांच्यासह कोटंबीच्या सरपंच वनिता दिलीप भुसारे, उपसरपंच पंढरीनाथ पालवी, सदस्य भास्कर पांडुरंग भुसारे, जयवंत पुंडलीक राऊत या सर्वांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४(ग) नुसार अपात्र ठरविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी रंजना भुसारे व शशिकांत राऊत यांनी केली होती. त्यावर सुधाकर राऊत यांनी आता शशिकांत भुसारे यांनीच ग्रामपंचायतीअंतर्गत कृषी, समाजकल्याण व अन्य विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांद्वारे घेऊन एकाच व्यक्तीला इतके सगळे लाभ कसे मिळू शकतात, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Should be investigated for land grabbing benefit: Sudhakar Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.