शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:46 AM

लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साधारणत: पदे बदलली जात नाहीत. संघटनावर त्याचा परिणाम होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पक्षांत बदलण्याचे काम अगोदर केले जाते किंवा निवडणूक निकालाच्या पश्चात केले जाते. परंतु सेनेने मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच बदल केले आहेत.पूर्वी नाशिक पूर्व विधानसभेची जबाबदारी मिलिंद घनकुटकर, पश्चिम विधानसभा मतदारसंघाची नीलेश चव्हाण यांच्याकडे, तर मध्य नाशिकची जबाबदारी हेमंत रासम यांच्याकडे होती. त्याऐवजी आता पूर्व मतदारसंघाकडे गिरीश विचारे, मध्य नाशिकमध्ये ललित शाईवाले तसेच पश्चिमची जबाबदारी प्रकाश वाणी यांच्याकडे देण्यात आली आहे. जुन्या संपर्क प्रमुखांच्या काळात मध्यमध्ये अनेक संघटनात्मक रचनांची कामे अपूर्ण होती, तर पश्चिममध्ये संपर्कप्रमुखच सत्तेची स्वप्ने बघू लागली होती असे समजते. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने बदल केले आहेत.शिवसेनेने हे बदल तातडीने झाले असले तरी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे दिसत आहेत. आमदार आणि शहराध्यक्ष असे दुहेरीपदे भुषविणाऱ्यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. संघटना आणि सत्तेची पदे एकाच व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती संघटनात्मक कामांना न्याय देऊ शकणार नाही, अशी बाजू पक्षाच्या वतीने मांडली जात होती. मात्र वेळेत हा बदल अमलात आलानाही. आता लोकसभा निकालानंतरच बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले, तर कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेरदेखील गच्छंतीतून तूर्तास बचावले आहेत. आहेर यांना हटविण्यासाठी तयारी झाली होती.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी सर्वांचे  म्हणणे ऐकले होते त्यानंतर महापालिकेतील गटनेता शाहू खैरे यांना बदलल्यानंतर आता  आहेर यांचा क्रमांक लागणार  अशी चर्चा असतानाचलोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने तूर्तास ते बचावल्याचे सांगितले जाते.पदांच्या खिरापतींचे वाटपएकीकडे शिवसेनेकडून संपर्कप्रमुखांत बदल केले जात असताना दुसरीकडे अनेक पक्षांकडून विशेषत: भाजपाकडून पदांचे खिरापतीसारखे वाटप सुरू झाले आहेत. गेली साडेचार वर्षे काहीच सत्तापद किंवा समित्या न मिळालेल्यांना संघटनात्मकपदे देण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना