शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

घोटीच्या मित्र मंडळाची सातारा जिल्ह्यात शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 8:06 PM

घोटी : येथील कळसुबाई मित्र मंडळाने सातारा जिल्ह्यातील लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट देत रंगपंचमी साजरी केली.

ठळक मुद्दे गडकिल्ल्यांवर सणवार साजरे करतात.

घोटी : येथील कळसुबाई मित्र मंडळाने सातारा जिल्ह्यातील लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट देत रंगपंचमी साजरी केली.इतिहासाचा वारसा जपण्यासाठी घोटीतील ट्रेकिंगवीर प्रत्येक उत्साहाच्या दिवशी वेगवेगळे उपक्र म राबवत असतात. विशेष म्हणजे हे सण आपल्या गावात अथवा घरी न साजरे करत घोटीतील ट्रेकिंगवीर इतिहासकालीन गड किल्ले यांचे संवर्धन व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत माहिती पोहचविण्याच्या उद्देशाने गडकिल्ल्यांवर सणवार साजरे करतात. त्याच पार्श्वभूमीवर घोटीचे ट्रेकिंगवीर भागीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली लिंबा गावातील तीन मजली विहिरीला भेट दिली.या ऐतिहासिक तीन मजली बारामोटाच्या विहिरीला भेट देऊन तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा करून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.त्यानंतर दक्षिण काशी असलेल्या संगम माहुली गावाजवळील कृष्णानदी व वेण्णा नदीच्या संगमावर जाऊन राणी येसूबाई, राणी ताराराणी, शाहू महाराज यांच्या दुर्लक्षित समाधींचे पूजन केले. तळबीडला स्वराज्याचे सरसेनापती यांच्या समाधीचे पूजन केले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला या जलदुर्गांवर जाऊन इतिहास आणि माहिती जाणून घेतली.या प्रसंगी कळसुबाई मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, डॉ. महेंद्र आडोळे, बालाजी तुंबारे, गोकुळ चव्हाण, अशोक हेमके, बाळु आरोटे, प्रवीण भटाटे, निलेश पवार, प्रशांत जाधव, अभिजीत कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.