शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:58 IST

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नद्यांना गटारीचे स्वरुपउपनद्या ही गोदामाईची ताकदकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावणारी गोदावरी नदी भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. दुर्दैवाने या नदीच्या उगमस्थानाजवळच धरणे बांधली गेली. त्यामुळे तीचा मूळ नैसर्गिक स्वभाव आणि रचना विस्कळीत झाली. गोदामाईला पुनर्जिवित करण्यासाठी ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जिवीत नदी’ संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी केले.

निमित्त होते, नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात मंगळवारी (दि.४) दुपारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘नदी प्रदूषण : नागरिकांचा सहभाग’ या विषयावर देशपांडे यांनी या महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपिठावर परमिंदर सिंग, प्राचार्य निळकंठ निकम, किर्लोस्करचे मकरंद देवधर, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किरण रहाळकर उपस्थित होते.

मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नव्हे तर जगभरातील नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त होत आहे, याबाबत देशपांडे यांनी चर्चा केली. नाशिककरांनी गोदा फेस्टीव्हल’ची मुहूर्तमेढ रोवल्यास तरुणाई अधिकाधिक आकर्षित होईल. या फेस्टच्या माध्यमातून गोदावरी शिवार फेरी, विषारीद्रव्य मुक्त जीवनशैली, छायाचित्र प्रदर्शन, गोदा दत्तक उपक्रमाद्वारे पुरक अशी कृतीशील चळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नाशिककर दैनंदिन कामांमधून २२ ते ४० ग्रॅमपर्यंत केमिकल्सचा वापर दररोज करतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाण्याच्या माध्यमातून हजारो किलो विषारी द्रव्य दररोज मिसळतात, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.उपनद्या ही गोदामाईची ताकदगोदावरी नदीचे मुख्य वैशिष्टय आणि ताकद ही तीच्या उपनद्या आहेत. या नदीला मोठ्या संख्येने उपनद्या मिळतात. उगमापासून आळंदी उपनदी, नासर्डी, दारणा, बाणगंगा, प्रवरा, कादवा, मंजिरा, पुर्णा या मुख्य उपनद्या गोदावरीला थेट औरंगाबादपर्यंत येऊन मिळतात. यामुळे या नदीचा विस्तारदेखील मोठा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नदीची व्याख्याच प्रशासनाकडे नसल्यामुळे सगळे आराखडे, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वीNashikनाशिकenvironmentवातावरणgodavariगोदावरी