शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:58 IST

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नद्यांना गटारीचे स्वरुपउपनद्या ही गोदामाईची ताकदकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावणारी गोदावरी नदी भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. दुर्दैवाने या नदीच्या उगमस्थानाजवळच धरणे बांधली गेली. त्यामुळे तीचा मूळ नैसर्गिक स्वभाव आणि रचना विस्कळीत झाली. गोदामाईला पुनर्जिवित करण्यासाठी ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जिवीत नदी’ संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी केले.

निमित्त होते, नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात मंगळवारी (दि.४) दुपारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘नदी प्रदूषण : नागरिकांचा सहभाग’ या विषयावर देशपांडे यांनी या महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपिठावर परमिंदर सिंग, प्राचार्य निळकंठ निकम, किर्लोस्करचे मकरंद देवधर, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किरण रहाळकर उपस्थित होते.

मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नव्हे तर जगभरातील नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त होत आहे, याबाबत देशपांडे यांनी चर्चा केली. नाशिककरांनी गोदा फेस्टीव्हल’ची मुहूर्तमेढ रोवल्यास तरुणाई अधिकाधिक आकर्षित होईल. या फेस्टच्या माध्यमातून गोदावरी शिवार फेरी, विषारीद्रव्य मुक्त जीवनशैली, छायाचित्र प्रदर्शन, गोदा दत्तक उपक्रमाद्वारे पुरक अशी कृतीशील चळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नाशिककर दैनंदिन कामांमधून २२ ते ४० ग्रॅमपर्यंत केमिकल्सचा वापर दररोज करतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाण्याच्या माध्यमातून हजारो किलो विषारी द्रव्य दररोज मिसळतात, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.उपनद्या ही गोदामाईची ताकदगोदावरी नदीचे मुख्य वैशिष्टय आणि ताकद ही तीच्या उपनद्या आहेत. या नदीला मोठ्या संख्येने उपनद्या मिळतात. उगमापासून आळंदी उपनदी, नासर्डी, दारणा, बाणगंगा, प्रवरा, कादवा, मंजिरा, पुर्णा या मुख्य उपनद्या गोदावरीला थेट औरंगाबादपर्यंत येऊन मिळतात. यामुळे या नदीचा विस्तारदेखील मोठा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नदीची व्याख्याच प्रशासनाकडे नसल्यामुळे सगळे आराखडे, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वीNashikनाशिकenvironmentवातावरणgodavariगोदावरी