शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे : शैलजा देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:58 IST

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठळक मुद्देमानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नद्यांना गटारीचे स्वरुपउपनद्या ही गोदामाईची ताकदकिर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वतावरुन उगम पावणारी गोदावरी नदी भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. दुर्दैवाने या नदीच्या उगमस्थानाजवळच धरणे बांधली गेली. त्यामुळे तीचा मूळ नैसर्गिक स्वभाव आणि रचना विस्कळीत झाली. गोदामाईला पुनर्जिवित करण्यासाठी ‘गोदा फेस्टिव्हल’ची मुहूर्तमेढ नाशिककरांनी रोवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जिवीत नदी’ संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे यांनी केले.

निमित्त होते, नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या उद्घाटनाचे. गुरूगोविंदसिंग महाविद्यालयात मंगळवारी (दि.४) दुपारी झालेल्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ‘नदी प्रदूषण : नागरिकांचा सहभाग’ या विषयावर देशपांडे यांनी या महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. व्यासपिठावर परमिंदर सिंग, प्राचार्य निळकंठ निकम, किर्लोस्करचे मकरंद देवधर, महोत्सवाचे संचालक वीरेंद्र चित्राव, किरण रहाळकर उपस्थित होते.

मानवी हस्तक्षेपामुळे भारतातील नव्हे तर जगभरातील नद्यांना गटारीचे स्वरुप प्राप्त होत आहे, याबाबत देशपांडे यांनी चर्चा केली. नाशिककरांनी गोदा फेस्टीव्हल’ची मुहूर्तमेढ रोवल्यास तरुणाई अधिकाधिक आकर्षित होईल. या फेस्टच्या माध्यमातून गोदावरी शिवार फेरी, विषारीद्रव्य मुक्त जीवनशैली, छायाचित्र प्रदर्शन, गोदा दत्तक उपक्रमाद्वारे पुरक अशी कृतीशील चळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास देशपांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

नद्यांचा मुळ नैसर्गिक स्वभाव टिकवून ठेवत वसुंधरा आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. सहा राज्यांमधून प्रवास करणाऱ्या गोदावरीची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक नाशिककर दैनंदिन कामांमधून २२ ते ४० ग्रॅमपर्यंत केमिकल्सचा वापर दररोज करतो. त्यामुळे नदीपात्रात सांडपाण्याच्या माध्यमातून हजारो किलो विषारी द्रव्य दररोज मिसळतात, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.उपनद्या ही गोदामाईची ताकदगोदावरी नदीचे मुख्य वैशिष्टय आणि ताकद ही तीच्या उपनद्या आहेत. या नदीला मोठ्या संख्येने उपनद्या मिळतात. उगमापासून आळंदी उपनदी, नासर्डी, दारणा, बाणगंगा, प्रवरा, कादवा, मंजिरा, पुर्णा या मुख्य उपनद्या गोदावरीला थेट औरंगाबादपर्यंत येऊन मिळतात. यामुळे या नदीचा विस्तारदेखील मोठा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नदीची व्याख्याच प्रशासनाकडे नसल्यामुळे सगळे आराखडे, उपाययोजना केवळ कागदावरच राहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Earthपृथ्वीNashikनाशिकenvironmentवातावरणgodavariगोदावरी