शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शाहू महाराज यांनी उभे केले बहूजन समाज उत्थानाचे कार्य-संजय साळवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 18:11 IST

उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले.

ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराज होते सर्वसामान्यांचा तारणहारसामाजिक न्याय दिन सोहळ्यात संजय साळवे यांचे प्रतिपादन

नाशिक : उत्कृष्ठ प्रशासक, जनतेचा राजा व सर्वसामान्यांचा तारणहार असलेले राजर्षी शाहू महाराज यांची ओळख बहूजन समाजाच्या न्यायासाठी झटणारा लोकराजा अशी असून त्यांनीच या देशात बहूजन समाज उत्थानाचे कार्य उभे केले, असल्याचे प्रतिपादन प्रा. संजय साळवे यांनी केले.सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक यांच्यातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.२६) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानित्त प्राचार्य व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेत सामाजिक न्याय दिन सोहळा साजरा करण्यातआला. व्यासपीठावर नाशिकच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्राची वाजे, विशेष अधिकारी देविदास नांदगांवकर, प्राचार्य विलास देशमुख, सहाय्यक संचालक दिपक बिरारी व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीधर त्रिभुवन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह्यशाहू महाराजांचे जीवन कार्यह्ण विषयावर व्याख्यान देताना प्रा.संजय साळवे यांनी महर्षी शाहू महाराज यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडून सांगतानाच त्यांच्या विचारांचे आजच्या समाजाना अनुकरण करण्याची गरज असल्या मत व्यक केले. ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य लक्षणीय असून बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या धेय्याने त्यांनी विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे काढून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्या सुरू केल्या. प्राथमिक शिक्षण आपल्या राज्यामध्ये सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा दक्षिण भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांनीच केला असून समाजाच्या विकासासाठी तसेच दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी दाखवून दिलेल्या शिक्षण प्रसाराच्या वाटेवरच आपल्यालाही मार्गक्रमण करावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. तर मिरवणुका व जयंत्यापुरते महापुरूषांच्या जयंती साजरे करणे थांबविले पाहिजे. महापुरूषांच्या विचारांचा अंगीकार करणेच खऱ्या अर्थाने महापुरूषांना अभिवादन ठरणारे असल्याचे मत समाज कल्याण महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमूख यानी व्यक्त केले. दरम्यान, आश्रमशाळेमधील दहावीत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. मनिषा शुक्ल यांनी केले. तर श्रीधर त्रिभूवन यांनी आभार मानले.

दिंडीच्या माध्यमातून समतेचा संदेशसामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून सकाळी काढण्यात आलेल्या समता दिंडीला अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरु वात झाली. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्यासह मावळ््यांची व सेवकांची वेशभूषा घेऊन समता दिंडीत सहभाग घेतला. दिंडीत एनएसएस, एनसीसी, शासकीय वसतिगृहाच्या मुली व परिसरातील विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीNashikनाशिक