शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

शेतकऱ्यांना मिळणार सत्याहत्तर कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:27 AM

पाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देअर्थसंकल्पात दिलासा : येवला तालुक्यात २७०० लाभार्थी

गोरख घुसळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : राज्याच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बदल करून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाºया शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.दोन लाखांवरील कर्ज रक्कम भरल्यास शेतकºयांचे दोन लाख रु पये कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निकषानुसार येवला तालुक्यातील दोन हजार सातशे पात्र लाभार्थी शेतकºयांना सुमारे सत्याहत्तर कोटी रु पयांचे अनुदान मिळणार आहे. नियमितकर्ज भरणाºया शेतकºयांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याने पात्र शेतकºयांना सुमारे १० कोटी ४९ लाखांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे व सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी दिली आहे. राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात येत असून, दोन लाख रु पयांपर्यंत कर्ज असलेल्या येवला तालुक्यातील सुमारे १८ हजार ४३८ शेतकºयांना सुमारे दोनशे कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे.गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकºयांनी दुष्काळी स्थितीचा सामना करीत शेती कसली आहे. मात्र त्यात त्यांना नेहमीच नुकसान सोसावे लागल्याने अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. महाविकास आघाडीने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून, या निर्णयाने शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.- राजेंद्र गायकवाड, शेतकरी, कासारखेडेयेवल्यात नियमित कर्ज भरणारे सुमारे १०३८ लाभार्थी शेतकरी असून, त्यांना शासनामार्फत सुमारे १० कोटी ४९ लाख रु पयांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येवला तालुक्यातील दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले दोन हजार सातशे दहा पात्र लाभार्थी शेतकरी असून, आजमितीस सुमारे ७६ कोटी ५८ लाख १९ हजार रु पयांची थकबाकी आहे. पात्र शेतकºयांना दोन लाखांवरील २२ कोटी ३८ लाख रु पयांची रक्कम भरावी लागणार आहे. शासनाकडून कर्जमाफीच्या लाभापोटी ५४ कोटी वीस लाख रु पये अनुदान मिळणार आहे. तर नियमित कर्ज भरणाºया पन्नास हजार रु पयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. नव्याने कर्ज उपलब्ध न झाल्याने समाधानगेल्या काही वर्षांपासून राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे शेतीशी निगडित कर्जाची रक्कम तो फेडू शकला नाही. त्यामुळे शेतकºयांना शेतीसाठी नव्याने कर्ज उपलब्ध न झाले नाही. महाविकास आघाडीने राबविलेली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार