शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा

By admin | Updated: April 8, 2015 01:45 IST

दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा

नाशिक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या शनिवारी (दि़११) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये दिवाणी, फौजदारी दावे, प्रलंबित प्रकरणे, दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा काढला जाणार आहे़ न्यायालयातील वकील, पक्षकार यांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे यामध्ये ठेवावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी पत्रकार परिषदेत केले़ कारंजकर यांनी सांगितले की, न्यायालयांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दाव्यांची संख्या, न्याय मिळण्यासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा वेळेचा व पैशाचा होणारा अपव्यय यावर लोकअदालत हा प्रभावी उपाय ठरतो आहे़ न्यायालयीन वाद तडजोडीने मिटले जावेत यासाठी तीस वर्षांपासून न्यायालयांकडून प्रयत्न केले जाताहेत़ त्यासाठी लोकअदालत, मेडिएशनचाही वापर केला जातो आहे़ यासाठी विशेष करून न्यायाधीश व वकील या दोघांनाही प्रशिक्षण दिले जाते आहे़ न्यायालयातील दाव्यांमधील वादाचा मुद्दा अतिशय गौण असतो, यामध्ये वाद विकोपाला जाऊन वर्षानुवर्षे ही भांडणे सुरू असतात़ जिल्हा न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या आजमितीस १ लाख ३६ हजार ६१३ इतकी आहे़ लोकअदालतीमध्ये दाव्याच्या निपटाऱ्याबरोबरच परस्परातील संबंध तसेच राहतात व शुल्कही भरावे लागत नाही़ तसेच यामध्ये दावा निकाली निघाल्यास कोर्ट फी स्टॅम्पची रक्कमही परत मिळते़ जानेवारी ते डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या लोकअदालतींमध्ये २८१४ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी १४१९ दावे यशस्वीपणे निकाली काढण्यात आले़ जिल्हा न्यायालयात गतवर्षी १२ लोकअदालती झाल्या त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित ३१४७ प्रकरणे निकाली काढण्यात आले, तर २०१५ मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत तीन लोकअदालत झाल्या़ त्यामध्ये २९६ दावे निकाली काढण्यात आल्याचे कारंजकर यांनी सांगितले़ यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड़जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)