शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा

By admin | Updated: April 8, 2015 01:45 IST

दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा

नाशिक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या शनिवारी (दि़११) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे़ यामध्ये दिवाणी, फौजदारी दावे, प्रलंबित प्रकरणे, दावा दाखलपूर्व प्रकरणांवर सामंजस्याने तोडगा काढला जाणार आहे़ न्यायालयातील वकील, पक्षकार यांनी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे यामध्ये ठेवावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी पत्रकार परिषदेत केले़ कारंजकर यांनी सांगितले की, न्यायालयांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली दाव्यांची संख्या, न्याय मिळण्यासाठी लागणारा प्रदीर्घ कालावधी त्यामध्ये दोन्ही पक्षकारांचा वेळेचा व पैशाचा होणारा अपव्यय यावर लोकअदालत हा प्रभावी उपाय ठरतो आहे़ न्यायालयीन वाद तडजोडीने मिटले जावेत यासाठी तीस वर्षांपासून न्यायालयांकडून प्रयत्न केले जाताहेत़ त्यासाठी लोकअदालत, मेडिएशनचाही वापर केला जातो आहे़ यासाठी विशेष करून न्यायाधीश व वकील या दोघांनाही प्रशिक्षण दिले जाते आहे़ न्यायालयातील दाव्यांमधील वादाचा मुद्दा अतिशय गौण असतो, यामध्ये वाद विकोपाला जाऊन वर्षानुवर्षे ही भांडणे सुरू असतात़ जिल्हा न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची संख्या आजमितीस १ लाख ३६ हजार ६१३ इतकी आहे़ लोकअदालतीमध्ये दाव्याच्या निपटाऱ्याबरोबरच परस्परातील संबंध तसेच राहतात व शुल्कही भरावे लागत नाही़ तसेच यामध्ये दावा निकाली निघाल्यास कोर्ट फी स्टॅम्पची रक्कमही परत मिळते़ जानेवारी ते डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या लोकअदालतींमध्ये २८१४ प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी १४१९ दावे यशस्वीपणे निकाली काढण्यात आले़ जिल्हा न्यायालयात गतवर्षी १२ लोकअदालती झाल्या त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित ३१४७ प्रकरणे निकाली काढण्यात आले, तर २०१५ मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत तीन लोकअदालत झाल्या़ त्यामध्ये २९६ दावे निकाली काढण्यात आल्याचे कारंजकर यांनी सांगितले़ यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड़जयंत जायभावे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)