शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गोधनाच्या क्षुधाशांतीसाठी गोशाळाचालकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:09 IST

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे.

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा नागरिकांबरोबरच प्राण्यांनादेखील फटका बसला आहे. चाऱ्याचे भाव दुप्पट म्हणजे जवळपास साडेपाच हजार रुपये टन इतके झाल्याने नाशिकमधील गोशाळा अडचणीत आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक गावांत चारा शिल्लक आहे. परंतु गावांनी शहरी भाागातून किंवा अन्य ठिकाणहून येणाºया नागरिकांना गावबंदी केल्याने चारा असूनही तो आणता येत नाही अडचण झाली आहे.  गेल्या २३ मार्चपासून देशभरात लॉकडाउन आणि संचारबंदी सुरू आहे. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता बाकी सर्व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच बंदचा परिणाम मुक्या प्राण्यांवरदेखील होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गो शाळांनादेखील त्याचा फटका बसला आहे. नाशिकमधील अनेक गोशाळांपर्यंत चाराच पोहोचत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. दळणवळणाची साधने बंद असून अनेक ठिकाणी गावांमध्ये प्रवेश करण्यास मनाई असल्यानेदेखील चारा आणता येत नसल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका गोशाळेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांनी चारा नेण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु अन्य अनेक गोशाळामंध्ये अडचणी येत आहेत. संचारबंदीमुळे मजूर उपलब्ध नाही. काही ठिकाणी चारा आणि मजूर उपलब्ध आहेत. परंतु मजूर गावकºयांच्या विरोधात जाऊन चारा भरण्यास तयार नाही. सिडकोतील मंगल गोवत्स सेवा ट्रस्ट संचलित गो शाळेत सध्या २४ गायी आणि वासरे आहेत. चार महागल्याने या गो शाळांमध्ये एक वेळ चारा आणि एक वेळ भाजीपाला दिला जात असल्याचे या गोशाळेचे संचालक पुरुषोत्तम आव्हाड यांनी सांगितले. सध्या चाºयाचे दर अडीच हजारांवरून साडेपाच हजार रुपये प्रति टन असे झाले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे शहराकडे चारा येत नाही, अशी अवस्था आहे. सध्या तर गोशाळांना सहकार्य करणाºया दानशुरांनी पाठ फिरवल्यानेदेखील खर्च निघणे कठीण झाले आहे. तपोवनातील कृषी गो सेवा ट्रस्टच्या गो शाळेत २०० गायी आहेत. परंतु येथे सध्या चारा पाण्यासह अनेक अडचणी आहेत. सध्या महावीर इंटरनॅशनलसारख्या संस्थाच्या मदतीने गो शाळा कशी तरी सुरू आहे. परंतु लॉकडाउन आणि संचारबंदी वाढल्यास अडचण होणार आहे.अर्थात, काही गो शाळांकडे पूर्वनियोजनानुसार अगोदरच चाºया पाण्याची व्यवस्था असल्याने अडचण उद््भवत नाही. गंगापूररोडवरील मोरोपंत पिंगळे गो शाळेत नियोजनानुसार चाºयाचा रीतसर साठा करून ठेवण्यात आला असल्याने अडचण उद््भवलेली नाही असे या गोशाळेचे प्रमुख राजाभाऊ मोगल यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे नंदिनी गो शाळेत चारशे गायी आहेत. मात्र, पूर्वनियोजनानुसार सध्या चारा असल्याने अडचण जाणवत नसल्याचे महेंद्र पोद्दार यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक