शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:42 IST

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झालाआर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ३६ गावे सेमिक्रिटिकल झोनमध्ये येतात.चांदवड तालुक्यातील अनेक गावांची भूजलपातळी अत्यंत खालावली आहे. त्यासाठी पाण्याचा अतिउपसा कारणीभूत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शासकीय योजनेतून नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झाला. पाण्याचा अतिउपसा होऊ नये म्हणून सदर निर्णय योग्य वाटत असला तरी त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे. यासाठी विहीर पुनर्भरण सक्तीचे करणे आवश्यक आहे. या गावांमधील बहुतांश गावांमध्ये शेतीच्या सिंचनासाठी पिके घेण्यासाठी विहिरी व्यतिरीक्त अन्य व्यवस्था कमी आहे. पाटाच्या पाण्याची सोय नाही. पर्जन्यमान कमी असते. वर्षातून एकच पीक निघते व त्यातही पाणी देण्याची सोय नसल्यास केवळ पावसाच्या पाण्यावर पिके जगवायची कशी यासारख्या विवंचनेत विशेषत: अनु. जाती व जमातीचे शेतकरी आहेत. शेततळ्यात पाणी साठवण करणे महागड्या खर्चामुळे गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे आहे.सदर बंदीचा फटका फक्त गरीब शेतकºयांना बसणार असून आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकºयांकडे पाणी उपशासाठीच्या विहिरी, विंधन विहिरी, शेततळे यासारखी साधने असल्याने त्यांना मात्र समस्या निर्माण होत नाही.त्यामुळे ही बंदी उठविण्याची मागणी होत आहे. चांदवड तालुक्यातील उसवाड, डोंगरगाव, दुगाव, कोकणखेडे, पिंपळगाव धाबळी, रायपूर भडाणे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, निमोण, दरेगाव, भोयेगाव, मेसनखेडे बुद्रुक, मेसनखेडे खुर्द, डोणगाव, शिंगवे, दहेगाव (मनमाड), वागदर्डी, रापली, वडगावपंगु, कातरवाडी, राजदेरवाडी, नांदुरटेक, वडबारे, इंद्रायवाडी, राहुड, हट्टी, जैतापूर, एकरुखे, जांबुटके, पिंपळनारे, वडनैरभैरव, खडकजांब, धोतरखेडे, ही गावे सेमिक्रि टिकल वाटर शेडमध्ये येतात. यापूर्वीही चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील २२ गावे डार्क वॉटर शेडमध्ये होती; मात्र आठ वर्षांपूर्वी या गावातील विहिरींवरील बंदी शासनाने उठविली होती. त्याचप्रमाणे आताही शासनाने सदर बंदी उठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीची जवाहर रोजगार योजना गेल्या अनेक वर्षापासून लक्षांकाअभावी बंद असून ही योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.