शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

सेमिक्रिटकल झोन : चांदवड तालुक्यातील ३६ गावांतील विहिरींची पातळी खोल विहीर योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:42 IST

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झालाआर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय

दरेगाव : भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सर्व्हे करून जिल्ह्यातील सेमिक्रिटिकल, क्रिटिकल व ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये नवीन विहीर घेण्यात येऊ नये याबाबत बंदी करण्यात आली आहे. त्यात चांदवड तालुक्यातील ३६ गावे सेमिक्रिटिकल झोनमध्ये येतात.चांदवड तालुक्यातील अनेक गावांची भूजलपातळी अत्यंत खालावली आहे. त्यासाठी पाण्याचा अतिउपसा कारणीभूत आहे. त्यामुळे या गावांमध्ये शासकीय योजनेतून नवीन विहीर खोदण्याचा मार्ग बंद झाला. पाण्याचा अतिउपसा होऊ नये म्हणून सदर निर्णय योग्य वाटत असला तरी त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या असक्षम शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे. यासाठी विहीर पुनर्भरण सक्तीचे करणे आवश्यक आहे. या गावांमधील बहुतांश गावांमध्ये शेतीच्या सिंचनासाठी पिके घेण्यासाठी विहिरी व्यतिरीक्त अन्य व्यवस्था कमी आहे. पाटाच्या पाण्याची सोय नाही. पर्जन्यमान कमी असते. वर्षातून एकच पीक निघते व त्यातही पाणी देण्याची सोय नसल्यास केवळ पावसाच्या पाण्यावर पिके जगवायची कशी यासारख्या विवंचनेत विशेषत: अनु. जाती व जमातीचे शेतकरी आहेत. शेततळ्यात पाणी साठवण करणे महागड्या खर्चामुळे गरीब शेतकºयांच्या आवाक्याबाहेरचे आहे.सदर बंदीचा फटका फक्त गरीब शेतकºयांना बसणार असून आर्थिकदृष्ट्या संपन्न शेतकºयांकडे पाणी उपशासाठीच्या विहिरी, विंधन विहिरी, शेततळे यासारखी साधने असल्याने त्यांना मात्र समस्या निर्माण होत नाही.त्यामुळे ही बंदी उठविण्याची मागणी होत आहे. चांदवड तालुक्यातील उसवाड, डोंगरगाव, दुगाव, कोकणखेडे, पिंपळगाव धाबळी, रायपूर भडाणे, वाद, वराडी, कानडगाव, कुंदलगाव, निमोण, दरेगाव, भोयेगाव, मेसनखेडे बुद्रुक, मेसनखेडे खुर्द, डोणगाव, शिंगवे, दहेगाव (मनमाड), वागदर्डी, रापली, वडगावपंगु, कातरवाडी, राजदेरवाडी, नांदुरटेक, वडबारे, इंद्रायवाडी, राहुड, हट्टी, जैतापूर, एकरुखे, जांबुटके, पिंपळनारे, वडनैरभैरव, खडकजांब, धोतरखेडे, ही गावे सेमिक्रि टिकल वाटर शेडमध्ये येतात. यापूर्वीही चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील २२ गावे डार्क वॉटर शेडमध्ये होती; मात्र आठ वर्षांपूर्वी या गावातील विहिरींवरील बंदी शासनाने उठविली होती. त्याचप्रमाणे आताही शासनाने सदर बंदी उठविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीची जवाहर रोजगार योजना गेल्या अनेक वर्षापासून लक्षांकाअभावी बंद असून ही योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.