शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

रोपे लागवडीतून करा स्त्रीजन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:12 AM

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही योजना राबविली जात असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना शेतकरी कुटुंबाने येत्या जूनपूर्वी रितसर अर्ज जमा करावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी श्याम रनाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वनविभागाकडून नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शासनाने याबाबत अध्यादेश काढला असून ‘कन्या वनसमृद्धी’ योजनेअंतर्गत ज्या शेतकरी कुटुंबाला कन्या रत्न प्राप्त होईल त्या कुटुंबाने त्या कन्येच्या नावाने बांधावर दहा रोपे लावावी. अर्जाचे नमुने सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध क रून दिले जात आहे. त्या नमुना अर्जात आवश्यक ती माहिती भरून संबंधित कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे जमा करावे. ग्रामपंचायतींना जवळच्या रोपवाटिकेतून प्रती कुटुंबप्रमाणे दहा रोपे पुरविली जाणार आहे. यामध्ये सागाची पाच तर आंबा-२, फणस, जांभूळ, चिंच प्रत्येकी १ अशी दहा रोपे दिली जाणार असल्याचे रनाळकर म्हणाले. जुलै महिन्यात रोपांची लागवड बांधावर करावी. जूनअखेर रोपांची उपलब्धता ग्रामपंचायतींना केली जाणार असल्याचे ते म्हणाले. २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या नावाने रोपे लागवड करता येणार आहे.वृक्षलागवडीतून अल्पभूधारकांना १०० टक्के लाभमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के लाभ मिळवून देणारी रोपे लागवड व संवर्धन योजना राबविण्यात येत आहे. १ जून ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वृक्षलागवड शेतजमिनीवर किंवा बांधावर करण्याची मुदत आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रती रोपाप्रमाणे तीन वर्षे संगोपन केल्यास ५०७ रुपये तर तसेच प्रतिहेक्टरवर किमान अडीच हजार रोपांची लागवड लाभार्थी करू शकतात. यामध्ये फळझाडांसह सागासारख्या टिंबर वृक्षांच्या प्रजातींचा समावेश असेल. सर्व रोपांचा पुरवठा मोफत केला जाणार आहे.शहराजवळील खेडींचाही समावेशमहापालिका हद्दीतील गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, चेहेडी, एकलहरे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, म्हसरुळ अशा खेडींमधील शेतकरी कुटुंबेदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहराजवळ असलेल्या या खेड्यांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबात मागील वर्षी तसेच चालू वर्षी कन्यारत्न जन्माला आले आहे. त्यांनी थेट नाशिकरोड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात संपर्क साधून नमूना अर्ज जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Womenमहिलाforestजंगल