शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

सुरक्षा धोक्यात : डझनभर हौशी पर्यटकांना वर्षभरात वालदेवी धरणात जलसमाधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:22 IST

पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत.

ठळक मुद्देपिंपळद ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी

बाबासाहेब गोसावी, नाशिक : पिंपळद येथील वालदेवी धरण परिसरात येणाऱ्या अनेक पर्यटकांना पोहता येत नसताना, विनाकारण पाण्यात उतरण्याचा अतिउत्साह त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. गेल्या वर्षभरात दहा ते बारा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, तरीही या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याने स्थानिक गावकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे .

 स्थानिक ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील या ठिकाणी सुरक्षिततेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या ठिकाणी अनेकांचे बळी जात आहेत. पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात , मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. याच गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा व्यवस्थापन समिती प्रशासनाकडून स्थानिक पोलीस प्रशासनाने समन्वय साधून धरण परिसरात होणाऱ्या पार्ट्याना अटकाव करावा , अशी मागणी पिंपळद ग्रामस्थ, शेतकरी व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.---नाशिक शहराला लागून अनेक तलाव असून त्यामध्ये विल्होळी, पिंपळद, मुकणे, गंगापूर या धरण परिसरात नाशिक, सिडको येथून अनेक तरुण येत असतात, पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात, पाण्याच्या खोलीचा त्यांना अंदाज येत नसल्याने अनेक दुर्दैवी घटना घडतात. गावकरी, शेतकरी यांना खूप त्रास होत असतो. पिंपळद ग्रामपंचायत, स्थानिक पोलिस स्टेशन या प्रशासनाला खूप त्रास होतो. - निर्मलाताई कड , उपसरपंच, पिंपळद

टॅग्स :NashikनाशिकNashik Floodनाशिक पूरNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलPoliceपोलिसdam tourismधरण पर्यटन