शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द

By sanjay.pathak | Updated: May 23, 2018 01:02 IST

रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सेझमध्ये रतन इंडिया बरोबर एमआयडीसी भागीदार असून, त्यांनीदेखील या प्रकल्पाला वाºयावर सोडले आहे.

नाशिक : रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सेझमध्ये रतन इंडिया बरोबर एमआयडीसी भागीदार असून, त्यांनीदेखील या प्रकल्पाला वाºयावर सोडले आहे.केंद्र सरकारने एसईझेड प्रकल्प मंजूर केल्यानंतर नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव आणि गुळवंच येथे हा प्रकल्प साकारण्याचे ठरल्यानंतर त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणजेच या प्रकल्पाच्या संचलनासाठी विशेष उद्देश वाहन अशी एक कंपनी करण्यात आली. त्यात राज्य औद्योगिक विकास महामंडळाला भागीदार करण्यात आले.  सिन्नरसारख्या दुष्काळी भागात हा प्रकल्प साकार करताना भूसंपादनात तत्कालीन एमआयडीसीनेदेखील मोठा सहभाग दाखवला होता. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राचे संपादन केल्यानंतर रेल्वे रूळलाइनसाठी देखील त्यावेळी एमआयडीसीचा पुढाकार होता. मात्र, कालांतराने इंडिया बुल्समधून बाहेर पडलेल्या रतन इंडियाने त्याची सूत्रे घेतली आणि कामकाज सुरू केले. त्याचवेळी एमआयडीसीनेदेखील काढता पाय घेतला.  राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाले, त्याचवेळी रतन इंडियाने सिन्नरमध्ये पहिल्या टप्प्यातील २७० मेगावॉटचा एक संच असे पाच संच तयार केले. त्यासाठी विदेशी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आणि वीजनिर्मितीची चाचणी घेतली. सेझमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे विजेचा होता. त्यानंतर अन्य कंपन्यांसाठी सुमारे सोळाशे भूखंड होते, त्यावर अन्य कंपन्यांना संधी देण्यात येणार होती. दुसºया टप्प्यातही रतन इंडिया याच प्रकल्पात १३५० मेगावॉटची निर्मिती करणार होती. म्हणजेच नाशिकच्या सेझमध्येच तब्बल २७०० मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट होते. परंतु पहिल्या टप्प्यातच वीजनिर्मिती करूनही त्यातून काहीच हाती न आल्याने रतन इंडियाने आपला दुसरा प्रकल्प गुंडाळला आहे.पहिल्या प्रकल्पावरच कंपनीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले होते. हे कर्ज खाते एनपीएमध्ये गेल्याने प्रकल्पावर अखेरीस पॉवर फायनान्स कार्पोरेशनने ताबा घेतला आहे.एमआयडीसी बघ्याच्या भूमिकेतया प्रकल्पात औद्योगिक गुंतवणूक वाढावी यासाठी एमआयडीसीकडून प्रयत्न होणे आवश्यक होते. तसे तर झाले नाहीच शिवाय या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज राज्य सरकारने खरेदी करावी यासाठी महामंडळ अथवा उद्योग मंत्रालयामार्फत देखील कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.  रतन इंडियाचा पहिला प्रकल्प साकारल्यानंतर त्यातून निर्माण होणारी वीज राज्य सरकारने खरेदी करणे अपेक्षित होते. कोणत्याही खासगी वीज उत्पादकाची वीज सरकार खरेदी करते आणि मग ती वीज वितरित केली जाते. खासगी उत्पादकाला वीज परस्पर खासगीस्तरावर विकता येत नाही. अशी परिस्थती असल्याने राज्य सरकारने वीज खरेदी करणे क्रमप्राप्त होते.

टॅग्स :electricityवीज