शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

दिवाळी सुटीच्या हंगामात  नाशिककर गाठणार समुद्रकिनारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 01:30 IST

दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.

नाशिक : दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.दिवाळीच्या पार्र्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये, कार्यालयांना सुटी असते. तीन ते चार दिवसांचा सण आटोपताच सुटीचा आनंद लुटण्यासाठी नाशिककर घराबाहेर पडण्याच्या बेतात आहेत. पर्यटनाच्या नियोजनामध्ये नागरिकांकडून माथेरान, अंबोली, महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, पुणे, लोणावळा-खंडाळा, गोवा, कोकण आदी भागांचा समावेश आहे. पर्यटन विकास महामंडळाकडे बहुतांश नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकण पर्यटकांच्या गर्दीने फुलणार आहे.येवा, कोकण आपलोच आसा...यंदा दिवाळीच्या हंगामात कोकणातील तारकर्ली, रत्नागिरी, गणपती पुळे, गुहागर, हरिहरेश्वर, वेलनेश्वर, दिवे-आगर, आवास, मालवण, रेवदंडा, अलिबाग असे सुमारे बारा ते पंधरा समुद्रकिनारे कोकणाला लाभलेले आहेत. तसेच भेरलीमाड, राया, आंबा, सुपारी, केळी, फणस, नारळ, काजू, कोकम यांसह भातशेती हे कोकणचे वैशिष्ट्य मानले जाते. कोकण पर्यटनामध्ये बहुतांश पौराणिक मंदिरांना भेटी देत धार्मिक पर्यटनासह सागरी व नैसर्गिक पर्यटनाचाही आनंद लुटता येतो. याबरोबरच विजयदुर्ग, मुरूड-जंजिरा, महाडजवळील रायगड या किल्ल्यांची भटकंती करत दुर्ग पर्यटनही पूर्ण करता येते.निसर्गाच्या सान्निध्यात ‘दिवाळी’नाशिककर कोकणातील समुद्रकिना-यांसह गोवा, कर्नाटकसह थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचे बेत आखत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मनमुरादपणे आनंद लुटत दिवाळी साजरी करणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणांचीही भुरळ पडत आहे. पर्यटन महामंडळाचे रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहेत. आगाऊ नोंदणी करत नागरिकांनी देशाटनाची तयारी केली आहे.पर्यटकांचा यावर्षी केरळकडे जाण्याचा ओघ अत्यंत कमी आहे. त्याऐवजी नागरिकांकडून कोकण परिसरातील समुद्रकिनाºयांसह गोव्याची निवड केली जात आहे. कोकण टूरसाठी पर्यटकांची संख्या अधिक आहे. भारतातील पश्चिम समुद्रकिनारा आणि सह्याद्रीची पर्वतरांग लाभलेल्या कोकणमधील निसर्गसौंदर्याचा अनुभव पर्यटकांकडून मोठ्या संख्येने लुटला जाणार आहे.पर्यटन विकास महामंडळासह खासगी पर्यटन व्यावसायिकांकडेही पर्यटकांनी ‘कोकण पॅकेज’ची नोंदणी केली आहे. तसेच महाराष्टÑाबाहेर राजस्थान राज्याच्या पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. राजस्थानमधील गड-किल्ले, वाळवंट बघण्यासाठी जयपूर, जोधपूर, जैसलमेर यांसारख्या शहरांची पर्यटकांकडून निवड केली जात आहे.

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिक