शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

दुगारवाडीत बुडालेल्या औरंगाबादच्या रघुवंशीचा शोध पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:57 IST

काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

ठळक मुद्देगुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हातीते तिघे 'तुम्ही येथे आमची वाट बघा...' असे सांगून गेले ते कायमचेच.

नाशिक :त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा गोरांतला (२१,) उप्पाला कोट्टी रेड्डी (२०), रिम्मालापुडी रघुवंशी (२१) हे तीघे मित्र आपल्या अन्य तीन मित्र-मैत्रिणीसह सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली डोहाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी तीघे बुडाले. यापैकी अनुशा, उप्पाला या दोघांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले; मात्र बेपत्ता झालेल्या रघुवंशीचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून गुरूवारी (दि.१९) दुपारी १२ वाजेपासून पुन्हा शोधकार्य राबविले जात आहे.

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमैत्रिणी दुचाकीद्वारे प्रवास करत औरंगाबाद येथून नाशिकला आले होते. औरंगाबादच्या कांचनवाडी येथील सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी होते. सहाही विद्यार्थी मुळ तेलंगणा राज्यातील आहे. शिक्षणासाठी ते औरंगाबादला वस्तीगृहात राहत होते. आकाश गिरिधर (२०), कैपू व्यंकटेश्वरा रेड्डी (२०, दोघे.रा.तेलंगणा), काव्या लक्ष्यशेट्टी (२०,रा. हैदराबाद) हे मित्र-मैत्रिणीदेखील यांच्यासोबत होते; मात्र हे तीघे दुगारवाडीच्या धबधब्यापर्यंत खाली उतरून गेले नाही तर वनविभागाच्या कमानीजवळच थांबले. काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

सायंकाळ होऊन अंधार पडू लागल्याने काव्या, कैपू, काव्या, आकाश हे तीघे दुचाकीवरून पुन्हा गंगापुर-गोवर्धन येथील एका विनियार्डमध्ये मुक्कामी आले. रात्री पुन्हा यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क मोबाईलवर केला; मात्र संपर्क होत नसल्याने हे तीघेही घाबरले. त्यामुळे या तीघांनी रात्री पुन्हा दुगारवाडी गाठण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या नागरिकांची मदत घेत या तीघांनी त्यांच्या डोंगर उतरून धबधब्याजवळ गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा शोध सुरू केला; मात्र येथे काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना सकाळीच शोध घेऊ असे सांगून काढून दिले. कारण या भागात वन्यजीवांचाही वावर आहे.

बुधवारी हे तीघे सकाळी पुन्हा धबधब्याजवळ पोहचले. गावक-यांच्या मदतीने शोध सुरू केला असता त्यांना काही अंतरावर तुटलेली चप्पल आणि दगडावर ठेवलेले मोबाइल सापडून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गावकºयांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे सागर गडाख यांचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत अनुषा, उप्पाला या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसिलदार दिपक गिरासे, सहायक निरिक्षक रामचंद्र कर्पे हे घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अंधार आणि वन्यजीवांसह सर्पांचा वावर असल्यामुळे वालावलकर यांनी शोधमोहीम थांबविण्याचे आदेश देत गुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरWaterपाणीAurangabadऔरंगाबाद