शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
3
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
4
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
5
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
6
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
7
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
8
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
9
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
10
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
11
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
12
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
13
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
14
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
15
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
16
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
17
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
18
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
19
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
20
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश

दुगारवाडीत बुडालेल्या औरंगाबादच्या रघुवंशीचा शोध पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:57 IST

काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

ठळक मुद्देगुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हातीते तिघे 'तुम्ही येथे आमची वाट बघा...' असे सांगून गेले ते कायमचेच.

नाशिक :त्र्यंबकेश्वरपासून जवळच असलेल्या दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या औरंगाबादच्या एका कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुषा गोरांतला (२१,) उप्पाला कोट्टी रेड्डी (२०), रिम्मालापुडी रघुवंशी (२१) हे तीघे मित्र आपल्या अन्य तीन मित्र-मैत्रिणीसह सहलीसाठी आले होते. धबधब्याखाली डोहाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मंगळवारी (दि.१७) संध्याकाळी तीघे बुडाले. यापैकी अनुशा, उप्पाला या दोघांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले; मात्र बेपत्ता झालेल्या रघुवंशीचा मृतदेह अद्याप हाती लागला नसून गुरूवारी (दि.१९) दुपारी १२ वाजेपासून पुन्हा शोधकार्य राबविले जात आहे.

याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, एकूण सहा मित्रमैत्रिणी दुचाकीद्वारे प्रवास करत औरंगाबाद येथून नाशिकला आले होते. औरंगाबादच्या कांचनवाडी येथील सीएसएमएसएस कृषी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी होते. सहाही विद्यार्थी मुळ तेलंगणा राज्यातील आहे. शिक्षणासाठी ते औरंगाबादला वस्तीगृहात राहत होते. आकाश गिरिधर (२०), कैपू व्यंकटेश्वरा रेड्डी (२०, दोघे.रा.तेलंगणा), काव्या लक्ष्यशेट्टी (२०,रा. हैदराबाद) हे मित्र-मैत्रिणीदेखील यांच्यासोबत होते; मात्र हे तीघे दुगारवाडीच्या धबधब्यापर्यंत खाली उतरून गेले नाही तर वनविभागाच्या कमानीजवळच थांबले. काव्याने अनुषा व उप्पाला यांनाही धबधब्यापर्यंत जाऊ नका..., येथूनच आपण पुन्हा माघारी निघून जाऊ असे सांगितले होते; मात्र ते तिघे ‘आम्ही खाली जाऊन बघून येतो, तुम्ही येथे आमची वाट बघा...’ असे सांगून गेले ते कायमचेच.

सायंकाळ होऊन अंधार पडू लागल्याने काव्या, कैपू, काव्या, आकाश हे तीघे दुचाकीवरून पुन्हा गंगापुर-गोवर्धन येथील एका विनियार्डमध्ये मुक्कामी आले. रात्री पुन्हा यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी संपर्क मोबाईलवर केला; मात्र संपर्क होत नसल्याने हे तीघेही घाबरले. त्यामुळे या तीघांनी रात्री पुन्हा दुगारवाडी गाठण्याचा निर्णय घेतला. जवळपासच्या नागरिकांची मदत घेत या तीघांनी त्यांच्या डोंगर उतरून धबधब्याजवळ गेलेल्या मित्र-मैत्रिणीचा शोध सुरू केला; मात्र येथे काळाकुट्ट अंधार, रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना सकाळीच शोध घेऊ असे सांगून काढून दिले. कारण या भागात वन्यजीवांचाही वावर आहे.

बुधवारी हे तीघे सकाळी पुन्हा धबधब्याजवळ पोहचले. गावक-यांच्या मदतीने शोध सुरू केला असता त्यांना काही अंतरावर तुटलेली चप्पल आणि दगडावर ठेवलेले मोबाइल सापडून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गावकºयांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. दुपारी अडीच वाजता वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे चांदोरी बचाव पथकाला मृतदेह काढण्यासाठी तसेच बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. ‘वैनतेय’ व चांदोरीचे सागर गडाख यांचे बचाव पथक सुमारे मागील सहा ते सात तासांपासून राबत अनुषा, उप्पाला या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसिलदार दिपक गिरासे, सहायक निरिक्षक रामचंद्र कर्पे हे घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री नऊ वाजेपर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अंधार आणि वन्यजीवांसह सर्पांचा वावर असल्यामुळे वालावलकर यांनी शोधमोहीम थांबविण्याचे आदेश देत गुरूवारी सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरWaterपाणीAurangabadऔरंगाबाद