शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:55 IST

भगूर नगरपालिका प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, सदरची शाळा पालिकेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळेला भाड्याने दिलेली आहे. परंतु शाळा मोडकळीस आली असून, कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे.

भगूर : भगूर नगरपालिका प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, सदरची शाळा पालिकेने मराठा विद्या प्रसारक समाजाच्या शाळेला भाड्याने दिलेली आहे. परंतु शाळा मोडकळीस आली असून, कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहे.  भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० मे १९८६ रोजी करण्यात येऊन त्यावेळी शाळेसाठी १८ खोल्या आणि तळमजल्यावर सार्वजनिक कार्यासाठी सभागृह उभारण्यात आले. उद्घाटनानंतर पालिकेने सदरची शाळा जिल्हा परिषदेच्या मराठी जीवन शिक्षण विद्यामंदिर शाळेला इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गासाठी भाड्याने दिली, तर तळमजल्यावरील सभागृह नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जात असल्याने पालिकेला त्यापासून उत्पन्न मिळायला लागले. कालांतराने या इमारतीची डागडुजी कोणी करावी, असा वाद निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने शाळेचे स्थलांतर केले. त्यानंतर ही शाळा नाशिक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अभिनव बालमंदिर शाळेस १९९८ भाड्याने देण्यात आली. आता या शाळेची दुरवस्था झाली असून, जवळच असलेल्या झोपडपट्टीतील तरुणांनी या इमारतीच्या खिडकीच्या काचा फोडून टाकल्या आहेत. तसेच तळमजल्यावरील सभागृहाचे दरवाजे व खिडक्या काढून नेल्या असून, या ठिकाणी दारूच्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. फक्त इमारतीच्या पुढील भागात मैदान असून, काही वर्गखोल्या चांगल्या आहेत. त्यात अभिनव बालविकास मंदिर आणि बालवाडीचे सहा वर्गात २०० मुले शिक्षण घेत आहेत. ही संस्था भगूर नगरपालिकेला ३३ हजार रुपये दरवर्षी भाडे अदा करीत असताना त्यामानाने भगूर पालिका इमारतीला काहीच सुधारणा देत नाही. इमारत धोकेदायक झाली आहे. यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिकेला चार ते पाचवेळा स्मरणपत्रे पाठविली असून, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी