शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

उन्हाच्या दाहकतेपासून बचावासाठी फळबागांवर साड्यांचे आच्छादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:07 PM

सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात उन्हाची दाहकता वाढल्याने याचा परिणाम जनसामान्यांबरोबरच फळबागांवरही होऊ लागला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून वावी, खोपडी, कहांडळवाडीतील अनेक शेतकऱ्यांनी फळबागावर रंगीबेरंगी साड्यांचे आच्छादन टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कडक उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी वावी येथील शेतकरी शंकर रसाळ, जगन रसाळ यांनी नऊशे डाळिंब झाडांना पंधराशे साड्यांचे आच्छादन टाकले आहे. एका झाडाला एक ते दीड साठी वापरली असून साड्या सिन्नर, विंंचूर, संगमनेर बाजारपेठेतून खरेदी केल्या आहेत. त्यांना या अच्छादनासाठी तेवीस हजार रूपये खर्च आला असून फळबागांचे तीव्र उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.वावी परिसरात अके शेतकऱ्यांकडे फळबागा आहेत. त्यापैकी काही फळबागा पाण्याअभावी करपल्या, तर काही फळबागा वाचविण्यासाठी झाडांना सावली करणे, झाडांच्या खोडाजवळ पाचट टाकणे, पाणी रात्री देणे, झाडांची छाटणी करून झाडावरील बोजा कमी करणे आदी विविध उपायात्मक योजना राबवून शेतकरी फळबागा वाचविण्यासाठी धडपडत आहेत.तालुक्यात फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने अनेक फळबागा संपुष्टात आल्या आहेत. ज्या शेतक-यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करून फळबागा जगवल्या, फळबागांवर उष्णतेचा परिणाम होऊ नये म्हणून शेतक-यांनी डाळिंबाच्या झाडांवर साड्यांचे आच्छादन टाकले आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातFarmerशेतकरी