शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

सटाणावासीयांना मिळणार महाराष्ट्र दिनी पुनंदचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:24 IST

सटाणा शहराला संजीवनी ठरणाऱ्या सुमारे ५१ कोटी रूपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून १ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्र दिनी नागरिकांना घरोघरी पुनंद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी  पोहचविण्याचा आपला मनोदय असल्याचा सटाणा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देधरणातून थेट जलवाहिनी : पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात

सटाणा : शहराला संजीवनी ठरणाऱ्या सुमारे ५१ कोटी रूपये खर्चाची पुनद पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असून १ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्र दिनी नागरिकांना घरोघरी पुनंद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी  पोहचविण्याचा आपला मनोदय असल्याचा सटाणा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी स्पष्ट केले.सटाणा शहराचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्याचे अभिवचन  निवडणुकीत देण्यात आले होते.  नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पुनद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाॅईंट टू पॉईंट समक्ष पाहणी केली व झालेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मोरे यांच्यासह पालिका प्रशासन अधिकारी, तांत्रिक समिती, तसेच ठेकेदारांच्या उपस्थितीत संपूर्ण योजनेची पाहणी करण्यात आली. पुनद पाणीपुरवठा योजनेंतर्गत सटाणा शहरातील चौगांव बर्डी येथील दोन जलकुंभ उभे करण्यात येत असून त्यांना आवश्यक संरक्षक भिंत उभारण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच शहराअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम देखील जोरदार सुरू असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.१८ किलोमीटर कामाची चाचणी यशस्वीकळवण तालुक्यातील पुनद धरणातून सटाणा शहरासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या ५१ कोटी रूपयांच्या योजनेने आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू झालेली आहे. या योजनेतंर्गत जलवाहिनीचे पुनद पासूनचे १८ कि.मी. च्या कामाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली असून, येत्या महिन्याअखेरपर्यंत अर्थात जानेवारी २१ पर्यंत सटाणा शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनीची चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे.विजेसाठी स्वतंत्र लाईन पुनद येथील जलशुद्धिकरण केंद्राचे कामाने देखील गती घेतली असून, जनतेला स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे यासाठी आवश्यक मशिनरी, तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. जलशुद्धिकरणासाठी आवश्यक २४ तास विजेसाठी स्वतंत्र लाईन घेण्यात येणार आहे. जलशुद्धिकरण केंद्रातील तांत्रिक कर्मचारी वर्ग देखील २४ तास उपलब्ध असावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी