शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

संत तुकाराम वनग्राम योजना : वनसंवर्धनात नाशिकचा गवळीपाडा ठरला उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 20:06 IST

जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देचराईबंदी, कु-हाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्नजल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर

नाशिक : वनसंरक्षण, संवर्धन आणि विकासासाठी पुरक अशी कामे करून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देत जैवविविधतेची जोपासणा करण्यामध्ये जिल्ह्यातील वनविभाग पुर्व, पश्चिम भागातील तीन गावांनी यश मिळविले आहे. संत तुक ाराम वनग्राम योजनेअंतर्गत गवळीपाडा, गौंदुने, श्रीघाट या गावांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याची माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लोकसहभागातून वनविकास साधताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन-वन्यजीव संवर्धनाकरिता पुरक ठरणारे उपक्रम राबवून २०१७-१८ या वर्षासाठी तीन गावे संत तुकाराम वनग्राम योजनेत विजयी ठरली. येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेऊन सातत्याने गावक-यांच्या मदतीने वनसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले.वनविभाग पुर्वमधील दिंडोरी तालुक्यातील मौजे गवळीपाडा (महाजे) येथील वनव्यवस्थापन समितीने २०११-१२सालापासून ३६७ हेक्टर क्षेत्रावर चराईबंदी, कु-हाडबंदी करून वनसंवर्धनासाठी प्रयत्न केले. वनविभागाकडून सोपविण्यात आलेल्या या क्षेत्राची उत्कृष्ट पध्दतीने देखभाल करत क्षेत्रावरील वनविकास व संवर्धन करण्यावर भर दिला. त्यामुळे येथील विविध वृक्षप्रजातीची जोपासना होण्यास मदत झाली. याबरोबरच या समितीने २०१४-१५साली वनविकास यंत्रणा योजनेअंतर्गत ७५हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेतले. शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५०कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत २०हेक्टर क्षेत्रावर रोपवन घेण्यात आले. तसेच जल व मृद संधारणाची कामेही करण्यावर भर दिला. जुन्या साग रोपवनाचेही संवर्धन यशस्वीपणे केले. त्यामुळे गवळीपाडा जिल्हास्तरावर संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या समितीला ५१ हजार रूपयांचे बक्षीस तर सुरगाणा तालुक्यातील गोंदुने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट आदिवासी पाड्यांच्या समित्यांना अनुक्रमे ३१ हजार (द्वितीय), ११ हजाराचे (तृतीय) बक्षीस वनविभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.बुधवारी बक्षीस वितरणसंत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत विजयी झालेल्या गावातील समित्यांच्या पदाधिका-यांना जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जाहीर समारंभात बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. उंटवाडी येथील वनविश्रामगृह येथे बक्षीस वितरणाचा सोहळा बुधवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता पार पडणार असल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागsant tukaramसंत तुकारामNashikनाशिकNatureनिसर्ग