शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

Sanjay Raut: 'यात्रा नव्हे, ही तर येड्यांची जत्रा; मुख्यमंत्र्यांनी अतिशहाण्याला कायद्याचा लगाम घातला', संजय राऊतांचा पुन्हा राणेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 11:59 AM

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यात भाजपाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या, पण त्यात एक अतिशहाणा निघाला. याची यात्रा नव्हे येड्यांची जत्रा सुरू आहे. त्यांनी मोदींचा आदेश पाळला नाही. अतिशहाणाल्याला कायद्याचा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी तो लगाम घातला, असा जोरदार हल्ला संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. 

संजय राऊत आज पक्ष कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत राणेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमध्ये शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं होतं. त्याचाही उल्लेख करत राऊतांनी नाशिकच्या शिवसैनिकांचं कौतुक केलं. जिथं पोहोचायचा होता तिथं नाशिकचा आवाज पोहोचला आहे. अख्ख्या देशात गेल्या ८ दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू होती. तुम्ही एफआयआर दाखल केलात तेव्हा मी भूवनेश्वरला होतो आणि तिथून परत आलो, असं संजय राऊत म्हणाले. 

यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा"राज्यात भाजपच्या भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांनीही मोदींच्या आदेशानुसार जनआशीर्वाद यात्रा काढली. पण त्यांनी कुणीही शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली नाही. पण यात एकच अतिशहाणा निघाला. मुंबई विमानतळावर उतरल्यापासून त्यांनी खालच्या शब्दांत टीका सुरू केली होती. पण आपण नेहमी सभ्यता पाळत आलोय. बाळासाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. उगाच कुणाला अंगावर आम्ही घेत नाही आणि कुणी अंगावर आलंच तर सोडणार नाही. यांची यात्रा ही यात्रा नव्हे, येड्यांची जत्रा होती", असं संजय राऊत म्हणाले. 

"मोदींनी त्यांच्या नव्या मंत्र्यांना काय आदेश दिलेत ते मला जास्त माहित्येत. केंद्र सरकार करत असलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा आणि सरकारच्या कामांचा प्रचार आणि प्रसार करा, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या, असं मोदींनी सांगितलं आहे. पण एक अतिशहाणा मोदींचाही आदेश पाळत नाही. केंद्र सरकारचा प्रचार करण्याऐवजी शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर टीका करत सुटला आहे. ते जेव्हापासून मंत्री झालेत तेव्हापासून भाजप रोज १० फूट मागे जातोय आणि लवकरच भाजप फक्त अर्ध्याफूटावर येईल", असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे