शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Sanjay Raut: गुलाबरावांचा जुलाबराव होईल, ५० खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:34 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.

नाशिक-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी खासदार संजय राऊतनाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांनी संबोधित करताना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यात बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी संजय राऊत यांनी मुख्यत्वे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाबरावांचा जुलाबराव होईल त्यांना देण्यात आलेले ५० खोके पचणार नाहीत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

आमदार फुटल्यामुळे शिवसेना फुटलेली नाही. शिवसेना जागेवरच आहे असा दावा करत संजय राऊत यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी तुफान फटकेबाजी करत संजय राऊतांनी बंडखोरांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. "आमदारांकडून बंडखोरीबाबत विविध कारणं देण्यात येत आहेत. निधी मिळत नसल्याची कारणं हे सांगत असले तरी त्यांचं दुखणं वेगळच आहे. या गुलाबरावांचा लवकरच जुलाबराव होईल. यांना ५० खोकी पचणार नाहीत", असं संजय राऊत म्हणाले. 

"शिवसेनेनं सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्त्व उभं केलं. नगरसेवक, आमदार, खासदार बनवलं याचाच जर यांना विसर पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत. बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणं दिली आहेत. पण खरं कारण त्यांनी लपवलं आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केलं आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही"बंडखोरांनी गद्दारी केलीय. पक्षप्रमुख चार महिने आजारी होते त्यामुळे कुणाला जास्त भेटू शकले नाहीत. याचाच फायदा घेऊन यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सर्वसामान्य जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. येथे जमलेले लोक ५० खोकी घेऊन नव्हे, तर स्वत:च्या खिशातले ५० रुपये खर्च करून उपस्थित आहेत. हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंना ज्यादिवशी वर्षा बंगला सोडावा लागला त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या अश्रूंमध्ये बंडखोर वाहून जातील. बंडखोर आमदारांना शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले. 

काही आमदार गेले म्हणजे शिवसेना फुटली असं होत नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. ही ताकद शिवसेनेचीच आहे, असंही राऊत म्हणाले. 

आम्ही रायगडाला सलाम करतोआम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना  महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही,  शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNashikनाशिकShiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील