शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Sanjay Raut: गुलाबरावांचा जुलाबराव होईल, ५० खोकी पचणार नाहीत; संजय राऊतांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:34 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत.

नाशिक-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसलेला असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रमुख नेते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसैनिकांना बळ देण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी खासदार संजय राऊतनाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांनी संबोधित करताना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यात बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी संजय राऊत यांनी मुख्यत्वे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाबरावांचा जुलाबराव होईल त्यांना देण्यात आलेले ५० खोके पचणार नाहीत, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 

आमदार फुटल्यामुळे शिवसेना फुटलेली नाही. शिवसेना जागेवरच आहे असा दावा करत संजय राऊत यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी तुफान फटकेबाजी करत संजय राऊतांनी बंडखोरांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. "आमदारांकडून बंडखोरीबाबत विविध कारणं देण्यात येत आहेत. निधी मिळत नसल्याची कारणं हे सांगत असले तरी त्यांचं दुखणं वेगळच आहे. या गुलाबरावांचा लवकरच जुलाबराव होईल. यांना ५० खोकी पचणार नाहीत", असं संजय राऊत म्हणाले. 

"शिवसेनेनं सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्त्व उभं केलं. नगरसेवक, आमदार, खासदार बनवलं याचाच जर यांना विसर पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत. बंडखोर आमदारांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेक कारणं दिली आहेत. पण खरं कारण त्यांनी लपवलं आहे. त्यांना निधीची पूर्तता आणि ईडीच्या तावडीतून सूटका मिळाल्याने त्यांनी हे कृत्य केलं आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही"बंडखोरांनी गद्दारी केलीय. पक्षप्रमुख चार महिने आजारी होते त्यामुळे कुणाला जास्त भेटू शकले नाहीत. याचाच फायदा घेऊन यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. सर्वसामान्य जनता मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे. येथे जमलेले लोक ५० खोकी घेऊन नव्हे, तर स्वत:च्या खिशातले ५० रुपये खर्च करून उपस्थित आहेत. हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंना ज्यादिवशी वर्षा बंगला सोडावा लागला त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या अश्रूंमध्ये बंडखोर वाहून जातील. बंडखोर आमदारांना शिवसैनिकांची हाय लागल्याशिवाय राहणार नाही", असंही संजय राऊत म्हणाले. 

काही आमदार गेले म्हणजे शिवसेना फुटली असं होत नाही. शिवसैनिक जागेवरच आहे. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. ही ताकद शिवसेनेचीच आहे, असंही राऊत म्हणाले. 

आम्ही रायगडाला सलाम करतोआम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्याना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना  महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा पंचप्राण आहे. आमचे धनुष्यबाण कोणीही हिरावून देऊ शकत नाही,  शिवसैनिक पेटले तर विझवणे मुश्किल होईल, हा महाराष्ट्र आदेशाची वाट पाहत आहे, असा इशाराही राऊत यांनी भाजपाला दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNashikनाशिकShiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील