शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उन्हाळी कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 6:21 PM

कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.

ठळक मुद्देहवालदिल : अर्धा चाळीत सडला तर उरलेल्याला कवडीमोल भाव

वटार : कसमादे परिसरातील शेतकºयांचे प्रमुख आणि हक्काचे पीक म्हणून ओळख असलेल्या कांद्याने सध्यातरी शेतकºयांचा वांधा केल्याचे चित्र असून, भाववाढीच्या अपेक्षेने वर्षभर सांभाळलेला अर्धा चाळीतच सडला तर उरलेला अर्धा कवडीमोल दराने विकला जात असल्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील कठीण झाल्याने आर्थिक गणित बिघडले असून, पुन्हा एकदा बळीराजा कर्जाच्या खायीत लोटला जात आहे.कांद्याचे दर दररोज घसरत असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला; मात्र कांद्याचे बाजार कोसळल्याने आता कांदा सरासरी ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दराने विक्र ी होत आहे. या विक्र ीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात साठविलेला कांदा नऊ महिन्यांनी शेतकरी बाजारात विक्र ीसाठी आणत आहे. या कांद्याला मार्च महिन्याच्या तुलनेत नगण्य भाव मिळत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यंदा कांद्याने पूर्ण वर्षाचे गणित बिघडविले असल्याची भावना शेतकºयांमध्ये आहे. मागील वर्षी याच कांद्याला दोन हजारापर्यंत भाव मिळाला होता. यंदा सद्यस्थितीत सरासरी ३०० ते ४०० रु पये दर कांद्याला मिळत आहे.गेल्या वर्षी लाल कांद्याला चांगला भाव मिळाला. यंदा पन्नास टक्के उत्पादन घटलेले असताना लाल कांद्याच्या दरानेदेखील माना टाकल्या आहेत.साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावफेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मार्च महिन्यात कांद्याला सर्वसाधारण भाव हा ७०० ते ८०० रु पये इतका होता. आज हा कांदा बाजारात विक्र ीसाठी आणला जात आहे. त्याला ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. साठविलेल्या कांद्याला आज मातीमोल भावाने विकला जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उन्हाळी कांद्याला उच्चांकी भाव चार हजाररु पयापर्यंत गेला होता.यंदाही चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदाचाळीत साठवणूक केली होती; मात्र सरकारने शेतकºयांना अच्छे दिन दाखवत याच दिवसात चार हजार रु पये जाणारा कांदा चारशे रु पयांवर आणून ठेवल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. चालू वर्षी फक्त आॅक्टोबर महिन्यात फक्त तीनच दिवस कांद्याला सरासरी दोन हजारपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला; मात्र त्यानंतर आजपर्यंत कांद्याच्या दरात एका पैशाचीसुद्धा वाढ झाली नसून कसमादेतील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ३०० ते ४०० रु पयांचा दर मिळत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदाFarmerशेतकरी