शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून अभयारण्यांचे द्वार ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:12 IST

नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची घोषणा : नांदूर-मध्यमेश्वर, कळसूबाई, यावल, अनेर डॅमचे द्वार खुले

नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी चारही अभयारण्यांचे प्रवेशद्वार कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीच्या अंमलबजावणीच्या अटीवर खुले करण्याचे आदेश मंगळवारी (दि.८) दिले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर विविध जिल्ह्यांमधील स्थिती लक्षात घेऊन टप्पेनिहाय तेथील व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नाशिक वनवृत्तामधील निफाड तालुक्यातील रामसर दर्जाचे नांदूर-मधमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्याचे अनेर डॅम अशा चारही अभयारण्यांमध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकारांना अभयारण्यांच्या नाक्यांवर तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा हंगाम नाही, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. मात्र, वर्षा सहलींसाठी कळसूबाईसह अन्य अभयारण्यांमध्ये पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या रोजगाराला चालना मिळावी, या उद्देशाने अभयारण्यांचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले जात असल्याचे अंजनकर यांनी सांगितले.भंडारदऱ्याला वाढणार पर्यटकांचा ओघपावसाळ्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढलेली असते. पांजरे, उडदावणे, घाटघर, रतनवाडी या भागांत वन्यजीव विभागाने स्वच्छतागृहांची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जाऊ नये. अभयारण्यात पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी ह्यसेल्फीह्ण काढू नये. जागोजागी लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.कोरोनामुळे गेल्या वर्षी पर्यटनाचा सर्वच हंगाम पाण्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने, तसेच काजवा महोत्सवदेखील झाला नव्हता. यावर्षी किमान पावसाळ्याच्या हंगामात पर्यटनामुळे स्थानिकांना लाभ होण्यास मदत होणार आहे. रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होईल. वनखात्याने अभयारण्यांमध्ये परवानगी दिल्याने धबधबे बघण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, तसेच अजून आठवडाभर काजव्यांची चमचमही अभयारण्यात अनुभवायास येऊ शकते.-केशव खाडे, गाईड, भंडारदरा.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक