शेतकरी संघटनेचे कृषी मंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:13+5:302021-02-23T04:21:13+5:30
अनुदान पुन्हा सुरु करावे आदी मागण्या शेतकरी संघटनेने रविवारी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे ...

शेतकरी संघटनेचे कृषी मंत्र्यांना साकडे
अनुदान पुन्हा सुरु करावे आदी मागण्या शेतकरी संघटनेने रविवारी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे . याप्रसंगी भुसे यांनी आपण शेतकरी संघटनेची व उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष मीटिंग घेऊन कार्यवाही करून त्यासंबंधी मी पाठपुरावा करील असं आश्वासन दि लं . जिल्ह्यातील निसाका व नासाका सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरु करावेत यासह अनेक शेतकरी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शंकर पुरकर, रामकिसन बोंबले संतू पाटील बोराडे तुळशीराम जाधव संजय जाधव बाळासाहेब हिगें यांसह जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट-
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस लागवड आणि साखर कारखाने यांची शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी असलेली गरज अधोरेखित करत निसाका व नासाका सुरु करण्यासाठी आजी माजी आमदारांनी एकत्र येऊन निसाका व नासा का सुरु करावा अशी मागणी संघटनेने केली आहे.
चौकट-
जिल्हा बँकेच्या जप्तीच्या कारवाई विरोधात केलेली आंदोलने आणि बंद पाडलेले शेतजमीन लिलाव तसेच जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडे शेतकरी संघटनेने केलेला पाठपुराव्यामुळे कर्जवसुलीस स्थगिती मिळाली परंतु कर्जवसुलीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग निघावा यासाठी जिल्हा बँकेने राष्ट्रीयीकृत बँकांचा आदर्श घेत कर्जावरील व्याज सोडून मुद्दलीतील १० ते २० टक्के रक्कम भरून एकरकमी परतफेड योजना राबवावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, यांनी केली.