शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सायखेड्याच्या विद्युत अभियंत्यास तीन तास डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 01:05 IST

कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्यांसमवेत सायखेडा कार्यालयात धडक मारली व टाळे ठोकत सहायक अभियंता मनोज कातकाडे यांना तीन तास कार्यालयात डांबले.

ठळक मुद्देकार्यालयास टाळे : सायखेड्याच्या शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

सायखेडा : कोणतीही पूर्वसूचना न देता गोदाकाठमध्ये वीज वितरण कंपनीने ट्रान्सफॉर्मर बंद केल्याने गुरुवारी (दि. २४) शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. करंजगावचे माजी सरपंच व महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वपक्षीय शेतकऱ्यांसमवेत सायखेडा कार्यालयात धडक मारली व टाळे ठोकत सहायक अभियंता मनोज कातकाडे यांना तीन तास कार्यालयात डांबले.

शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत तेथेच ठिय्या मांडला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुमतीने कातकाडे यांनी चालू देयके भरून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. गोदाकाठच्या करंजगाव, शिंगवे, चापडगाव, बेरवाडी, चाटोरी, तारुखेडले, म्हाळसाकोरे, भेंडाळी, महाजनपूर, तळवाडे आदी गावांतील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थकीत वीजबिलांअभावी खंडित करण्यात आला होता. द्राक्षाला भाव नसल्याने व आधीच गोदाकाठला ऊसतोड न झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटला व त्यांनी सायखेडा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, सायखेड्याचे सरपंच महेश कातकाडे, युवासेनेचे समन्वयक अनिकेत कुटे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम राजोळे, राष्ट्रवादीचे गटप्रमुख मंगेश पाटील राजोळे, भाजपचे दिलीप सानप, उपसरपंच शंकर राजोळे, सदस्य रावसाहेब पाटील राजोळे, नामदेवकाका पवार, रोहिदास कामडे, योगेश राजोळे, पुंजा भगुरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

इन्फो

अभियंत्याला विचारला जाब

राज्य बियाणे समितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी खंडित वीजपुरवठ्याबाबत सायखेड्याचे सहाय्यक अभियंता मनोज कातकाडे यांना जाब विचारत धारेवर धरले व कार्यालयात तब्बल तीन तास त्यांना कोंडून ठेवले. कार्यकारी अभियंता डोंगरे व उपअभियंता योगेश्वर पाटील यांच्याशी खंडू बोडके पाटील यांनी दूरध्वनीवर चर्चा करत तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

कोट...

गोदाकाठचे शेतकरी संकटांनी बेजार झाले आहेत. त्यातच भर म्हणून वीज कंपनीने सक्तीची वसुली सुरू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतात ऊस उभा असून, इतर पिकांना मातीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. अन्यथा यापुढे शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल.

- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव

फोटो - २४ सायखेडा एनर्जी

सायखेडा येथे वीज वितरण कंपनीचे अभियंता मनोज कातकाडे यांना कार्यालयात डांबून ठेवल्यानंतर ठिय्या मांडून बसलेले संतप्त शेतकरी.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीelectricityवीज