शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातही रुजावी :जयप्रकाश जातेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 01:38 IST

साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी काढले.

ठळक मुद्दे२२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन

वाडीवऱ्हे : साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी काढले.

इगतपुरी तालुका साहित्य मंडळाच्या वतीने कर्मवीर पुंजबाबा गोवर्धने महविद्यालयात आयोजित २२ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटन जातेगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी साहित्य चळवळ अशीच सुरु राहावी अशा शुभेच्छा देत सर्व सहित्यिकांना ९४ व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रक म्हणून निमंत्रण दिले. ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी माणसाने माणसाजवळ आपुलकीने जावे हे साहित्य संस्कृतीचे मूलतत्व आहे. सर्व भिंती तोडून साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी सांगितले, इथल्या मातीत या साहित्य संमेलनाच्या रूपाने तुकाराम धांडे सारखे कवी निर्माण झाले आहेत. यापुढेही आणखी साहित्यिक निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रथम सत्राचे अध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांनी संस्कृती जपण्याचे काम सहित्यसंमेलन करत आले आहे. ते असेच अविरत सुरु राहिल यासाठी सतत मद्त करू अशी ग्वाही दिली. यावेळी प्रशांत पाटिल, कवी प्रकाश होळकर, प्राचार्य भाबड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी टाळ मृदुंगांच्या गजरात, लेझमच्या तालात ग्रंथदिंडीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. २६/११ च्या हल्यात शहीद झालेले जवान,निष्पाप नागरिक तसेच दिवंगत साहित्यिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर, विवेक उगलमुगले, तुकाराम धांडे, विलास गोवर्धने, वैशाली आडके,सुभाष सबनीस, अलका दराडे, प्रवीण जोधळे, प्रा.डॉ. पी.आर.भाबड, मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर, नरेंद्र पाटिल,अलका कुलकर्णी, प्रा. आशा पाटील, बाळासाहेब धुमाळ आदि उपस्थित होते. ॲड. ज्ञानेश्वर गुळवे, प्रा. देवीदास गिरी, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटने यांनी सूत्रसंचालन केले.

इन्फो

परिसंवादांचे आयोजन

द्वितीय सत्रांत ‘ग्रामीण साहित्य संधी आणि आव्हाने’ तसेच ‘सहित्यातून व्यक्त होणारी स्त्री’ या विषयावर परिसंवाद झाला. तर संत साहित्यातील चिरंतन मूल्य यावर व्याख्यान झाले. शेवटी निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. यावेळी मुकुंद ताकाटे, राजेन्द्र सोमवंशी, प्रशांत केंदळे ,माणिकराव गोडसे या कवींनी सहभाग नोंदवला. शनिवारी (दि.२७) अध्यक्षीय भाषण आणि खुले कविसंमेलन होणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक