शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

राज्यपाल दबावात काम करतात का - सचीन सावंत याचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:07 IST

राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करतानाच राज्यपाल दबावत काम करीत असल्याची साशंकता सचीन सावंत यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देराज्यपाल सत्तास्थापनेचे आदेश का देत नाही राज्यपालांवर कोणाचा दबाव सचीन सावंत यांनी उपस्थित सवाल

नाशिक : राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे बेजार झाला असून जगण्यासाठी सघर्ष करीत आहे. मात्र महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये सत्ता संघर्षावरून चढाओढ सुरू असल्याची टिका करतानाच राज्यातील शेतकरी संकटात असल्यामुळे राज्यपालांनी बहूमताजवळ असलेल्या पक्षाला सत्तास्थापनेचे आदेश देणे अपेक्षित आहे. परंतु अशा स्थितीतही राज्यपाल सत्तास्थापनेबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे राज्यपाल कोणाच्या दबावाखाली कामकाज करीत आहेत काय असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सचीव तथा प्रवक्ते सचीन सावंत यांनी उपस्थित केला आहे. नाशिक येथे काँग्रेस कमीटीच्या कार्यालयात गुरुवारी (दि.७) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचीन सावंत म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यांनी सत्ता स्थापन करणे गरजे आहे. परंतु, निवडणुकीचे निकाल येऊन १४ दिवस उलटूनही सरकार स्थापन होऊ शकले नाही. यांदर्भात राज्यपालही कोणतीही कारवाई करीत नसल्याने ही चिंताजनक बाब असल्याचे नूमद करतानाच राज्यपाल दबावत काम करीत असल्याची साशंकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.  तसेच भाजप सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून बेरोजगारीत बेसुमार वाढ झाली आहे. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मीतेचे आश्वासन दिले होते. परंतु आता भाजपचे नेते पकोडे तळणे,भीक मागणे हेही रोजगाराचे साधनच असल्याची विधाने करीत आहेत. देशात सर्व उद्योग धंदे संकटात असताना अमित शाह  यांचे पूत्र जय शाह यांच्या संपत्तीत बेसूमार वाढ होत असून सत्तेच्या गैरवापर केल्यामुळे नेत्याच्या मुलांची संपत्ती वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचा आर्थिक विकास दर २०१४ पासून सातत्याने घसरत असून सरकारने गेल्या पाचवर्षात युवा वगार्चे भविष्य उध्वस्त करण्याचे काम केले आहे. या वर्षात हजारो कोटींचा अपहार झाला असताना त्यावर नियंत्रण नाहीतर अशाप्रकारांचे समर्थन केले जात आहे. आरबीआय सारख्या संस्थांची लूट सूरू असून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये सरकाने घेतल्याचा अरोपही त्यांनी यावेळी केला आहे. दरम्यान , भाजपाच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकाच्या धोरणा विरोधात आणि शेतकºयांच्या मागण्यांसाठी  नाशिक जिल्हा व शहर काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन  करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, हनिफ शेख आदि उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSachin sawantसचिन सावंत