शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Russia Ukraine War : युद्धात भरडले भारतीय विद्यार्थी! विमानांचे वाढले भाडे; २० हजारांचे तिकीट ६० हजारांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:55 IST

नाशिक : युक्रेन शहरापासून दूर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर चर्नीव्हिट्सीमध्ये असल्याने युद्धाची झळ तेंव्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र युक्रेनमधील ...

नाशिक : युक्रेन शहरापासून दूर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर चर्नीव्हिट्सीमध्ये असल्याने युद्धाची झळ तेंव्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र युक्रेनमधील शहरे जसजसी उद्ध्वस्त होत राहिली तसतसा त्याचा फटका आम्हाला बसला. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध आले, मॉल्स रिकामे होऊ लागले. खाण्यापिण्याच्या साहित्याचा तुटवडा निर्माण होत गेला आणि विमानांचे भाडे तीन पटीने वाढल्याने मायदेशी परतण्याची वाट दूर होत राहिली. दरदिवशी युद्धाची दाहकता वाढत असल्याने काळजाचा ठोका चुकत होता स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी आणि विमानतळांवर अडकलेल्या मित्रांसाठी.

युक्रेनच्या विध्वंस झालेल्या भूमीतून मायदेशात सोमवारी परतलेल्या नाशिकच्या रिद्धी शर्मा हिने आपल्या परतीचा थरारक अनुभव सांगितला. युक्रेन सोडण्याची वेळ आली; मात्र परतीचा मार्ग कसा असेल याबाबतची चिंता सतावत होती. खाण्यापिण्याच्या वस्तू लागणार होत्या; पण मॉल्स रिकामे होत राहिले. एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा लागत होत्या. शिवाय प्रत्येकाला केवळ २ हजार रुपये इतकेच काढता येत असल्याने इतक्या पैशात पुढे किती दिवस काढायचे, असा प्रश्नही होता.

भारतात परतण्यासाठीच्या विमान प्रवासाच्या यादीत नाव आले; मात्र चर्नीव्हिट्सी ते रुमानियाच्या बुकारेस्टपर्यंत पोहोचण्यासाठीचे ते ११ तास अनिश्चिततेने घेतले होते. कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नव्हते. विद्यापीठातून सायरट बाॅडेरकडे बसने निघालो. त्या बसचे वाढीव भाडे आम्हाला द्यावे लागले. बुकारेस्ट विमानतळाच्या दिशेने माणसांचे लोंढे येत असल्याने रस्त्यात कार, ट्रक्स, बस अशा गाड्यांच्या रांगा लागल्याने ट्रॅफीक जाम झाले होते. त्यामुळे आठ किलोमीटर मागेच आम्हाला उतरावे लागले. तेथून पायपीट करीत आम्ही विमानतळावर पोहोचलो. या ठिकाणी युक्रेनी नागरिकांचा रोष भारतीय विद्यार्थ्यांवर वाढत होता. गर्दीमुळे विमानांनाही विलंब होत होता. उणे तापमानात रात्र काढावी लागली; मात्र झोप कुणालाही लागत नव्हती, असे सांगताना रिद्धीच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळत होते.

सायंकाळी पाच वाजता बुकारेस्टवरून भारतासाठी भारतीय विमानाने उड्डाण घेतले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी ३ वाजता दिल्लीला पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आता सुरक्षित वाटतेय; मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींच्या सुटकेची चिंता वाटतेय, असे सांगून रिद्धीच्या नजरा टीव्हीवर युद्धाच्या बातमीवर खिळतात आणि चेहरा खिन्न होतो.

युक्रेनमधून भारतात परतण्यासाठी किमान २० ते २५ हजार रुपये इतके भाडे लागते. परंतु, युद्धामुळे युक्रेनियन भूमीवरून विमानांची उड्डाणे बंद झाली आणि रूमानियाच्या बाॅर्डरवरून विमाने असल्याने तेथून भारतात येण्यासाठी तीनपट भाडे वाढविण्यात आले. म्हणजे २० हजारांचे तिकीट ६० हजारांना झाले. ज्यांना भाडे भरणे शक्य होते, त्यांनी तिकिटे मिळविली.

युक्रेनी आणि भारतीयांमध्ये भांडणे

बुकारेस्टजवळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना तेथील सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे. युद्ध पेटत असताना विमानतळावर युक्रेनी नागरिक आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भांडणे होत होती. भारतीय विद्यार्थ्यांसाठी विमानांची व्यवस्था होत असताना तेथील नागरिकांना मात्र विमानांची सोय होत नसल्याने त्यांच्यात रोष होता.

२७ तारखेचे फ्लाईट तिकीट मिळाले

युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असतांना १५ तारखेलाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रिद्धीने विमानाचे तिकीट घेतले. २७ फेब्रुवारीचे तिकीट मिळाल्याने तीने मायदेशी निघण्याची तयारी केली होती. मात्र २४ तारखेपासूनच युद्धाला सुरूवात झाली आणि तिला विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच थांबावे लागले. २७ तारखेपूर्वीचे तिकीट मिळाले असते तर कदाचित रिद्धी विमानतळावर अडकून पडली असती. कारण युद्धानंतर युक्रेनची हवाई सेवा तत्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी