शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ग्रामीण पोलिसांचा स्कूल बसचालकांना ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:05 IST

पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली.

नाशिक : पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली. या तीन दिवसांत ग्रामीण भागातील काही ठराविक रस्त्यांवर वाहतूक नियमांची पायमल्ली करत धावणाऱ्या बसेसवर ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांनी ‘वॉच’ ठेवून कारवाई केली.नाशिक-गंगापूर, त्र्यंबकेश्वर, चांदशी, गिरणारे, ओझर, चांदवड या मार्गांवर सिंह यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने सलग तीन दिवस शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया बसेसवर करडी नजर ठेवली. सुमारे १५१ बसेसची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियम सर्रासपणे धाब्यावर बसविणाºया ४९ बसचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आरटीओच्या संयुक्त पथकाने ४९ वाहनांवर कारवाई केली असून, त्यातील काही चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहनचालकांकडून सहा हजार २०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी स्कूलबसमध्ये चालकासह परिचारक आहे की नाही याची तपासणी केली. चालक आणि परिचारकाची चारित्र्य पडताळणी करून घेण्याचेही आवाहन पोलिसांनी केले. वाहतूक नियम, विद्यार्थी सुरक्षितता याबाबत प्रबोधन करण्यात आले. आगामी दिवसांतही वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन पथकामार्फत स्कूल बसेसची नियमित तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीह विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडून उल्लंघनसिन्नर, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये कर्मचाºयांची वाहतूक करणाºया खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडूनही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. भरधाव वेगाने बस दामटवित दुचाकी, चारचाकीस्वारांना कट मारून सर्रासपणे बेजबाबदार व धोकादायकरीत्या ओव्हरटेक करत कंपन्यांचे बसचालक वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीस व आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खासगी कंपन्यांच्या बसेसकडून यापूर्वी अनेकदा ‘रॅश ड्रायव्हिंग’मुळे अपघात घडले आहेत. पोलिसांनी याबाबत तत्काळ पावले उचलून कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस