शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

ग्रामीण पोलिसांचा स्कूल बसचालकांना ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:05 IST

पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली.

नाशिक : पावसाळ्याचे दिवस सुरू असून, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना विद्यार्थी सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची तंबी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी शालेय बसचालकांना दिली. या तीन दिवसांत ग्रामीण भागातील काही ठराविक रस्त्यांवर वाहतूक नियमांची पायमल्ली करत धावणाऱ्या बसेसवर ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकांनी ‘वॉच’ ठेवून कारवाई केली.नाशिक-गंगापूर, त्र्यंबकेश्वर, चांदशी, गिरणारे, ओझर, चांदवड या मार्गांवर सिंह यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने सलग तीन दिवस शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया बसेसवर करडी नजर ठेवली. सुमारे १५१ बसेसची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतूक नियम सर्रासपणे धाब्यावर बसविणाºया ४९ बसचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस आरटीओच्या संयुक्त पथकाने ४९ वाहनांवर कारवाई केली असून, त्यातील काही चालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन दंड भरावा लागणार आहे. तसेच वाहनचालकांकडून सहा हजार २०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी स्कूलबसमध्ये चालकासह परिचारक आहे की नाही याची तपासणी केली. चालक आणि परिचारकाची चारित्र्य पडताळणी करून घेण्याचेही आवाहन पोलिसांनी केले. वाहतूक नियम, विद्यार्थी सुरक्षितता याबाबत प्रबोधन करण्यात आले. आगामी दिवसांतही वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन पथकामार्फत स्कूल बसेसची नियमित तपासणी केली जाणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले. तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनीह विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडून उल्लंघनसिन्नर, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये कर्मचाºयांची वाहतूक करणाºया खासगी कंपन्यांच्या बसचालकांकडूनही सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. भरधाव वेगाने बस दामटवित दुचाकी, चारचाकीस्वारांना कट मारून सर्रासपणे बेजबाबदार व धोकादायकरीत्या ओव्हरटेक करत कंपन्यांचे बसचालक वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे.याबाबत पोलीस व आरटीओ यांनी संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खासगी कंपन्यांच्या बसेसकडून यापूर्वी अनेकदा ‘रॅश ड्रायव्हिंग’मुळे अपघात घडले आहेत. पोलिसांनी याबाबत तत्काळ पावले उचलून कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस