शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

ग्रामसभेच्या सक्तीने ग्रामविकास यंत्रणा बुचकळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 7:38 PM

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी,

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : गर्दी टाळावी की करावी?सभा, समारंभांनाही परवानगी नाकारण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र चिंतेचे सावट असून, नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याबरोबरच स्वच्छतेविषयक खबरदारी घेण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना दुसरीकडे मात्र ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदा व ग्रामपंचायतींना पत्र पाठवून कोरोनापासून बचावासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती देण्यासाठी गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती केली आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असताना ग्रामसभेसाठी ग्रामस्थ एकत्र आल्यास कायद्याचे उल्लंघन होणार असल्याने ग्रामविकास विभागाच्या या पत्रामुळे यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जात असून, शासनाच्या आदेशानुसार नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी, शाळा, महाविद्यालयांना सुटी, मंदिरे, महाआरती बंद करण्यात आली आहे. सभा, समारंभांनाही परवानगी नाकारण्यात आली असून, आठवडे बाजार, यात्रा, धार्मिक उत्सव स्थगित करून नागरिकांना अधिकाधिक खबरदारी घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परिणामी नागरिकांनीही कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सरपंचांना पत्र पाठवून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत ग्रामपातळीवर काय करता येईल यासाठी आठवड्यातून एक दिवस ग्रामसभा घेण्याचे फर्मान काढले आहे. मुळात कोरोनाविषयी अजूनही समाजात अनेक समज-गैरसमज असून, सर्वसाधारणपणे सर्दी, खोकल्याचे प्राथमिक लक्षणांतूनच या आजाराचे निदान होत असते. सध्या हवामानातील बदल पाहता, सर्वत्र सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येतात. अशा परिस्थितीत विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो नागरिकांना एकमेकांपासून दूर ठेवणे हाच उपाय असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु ग्रामविकास विभागाने गावोगावी ग्रामसभा घेण्याची सक्ती करून विखुरलेल्या ग्रामस्थांना पुन्हा एकत्र आणून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनाच हरताळ फासला जाणार आहे. एकीकडे नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून कायद्याचा धाक दाखवायचा तर दुसरीकडे याच नागरिकांनी एकत्र यावे यासाठी ग्रामसभा घ्यायच्या अशा परस्पर भिन्न निर्णयामुळे ग्रामविकास अधिकारी पेचात सापडले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद