शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना पाणी नसल्याने कालव्याकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 18:57 IST

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.

ठळक मुद्देपिंपळगाव लेप परिसरात पिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांची अडचण

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप व परिसरात रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी पालखेड डावा कालव्याकडे नजर ठेवून आहेत.कांदा, गहू फ्लॉवर आदीसारख्या पिकांना उन्हाच्या तीव्रतेचा झटका बसून पिके होरपळून निघत आहे. येवला तालुक्याच्या काही भागात दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहीरी तळ गाठतात. मात्र फेब्रुवारी महिन्यात पालखेड कालव्याचे आवर्तन मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.सध्या चहुकडे उन्हाची लाहीलाही होत असल्याने रब्बी हंगामातील गहु, कांदा, हरभरा हे पिके येवल्याच्या पश्चिमेकडील धुळगांव, भाटगांव, सातारे, शेवगे, पिंपळगाव लेप, जऊळके, मानोरी, शिरसगांव लौकी या भागात प्रामुख्याने घेतली जातात. मात्र यांचे जीवन हे पालखेड डावा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असते. त्या भरवशावर शेतकरी लागवडी करतात.परंतु फेब्रुवारी महिन्यापासून पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने कांदा पिकाची लाही-लाही होतांना दिसत आहे. काद्यांना सध्या बरे भाव मिळत आहे.परंतु काद्यांना भरण्यासाठी पाणी शिल्लक नाही या चिंतेने शेतकरी भयभित झाला आहे. पाण्याअभावी कांदे हाताबाहेर गेल्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.या आठवड्यात पालखेड डावा कालव्याचे पाणी नाही सुटले तर कांदा पिकाचे नुकसान होईल म्हणून पाटबंधारे विभागाने तात्काळ दखल घेऊन पालखेड डावा कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडावे अशी मागणी भाजपा शाखा प्रमुख नामदेव दौंडे, प्रहार शाखा प्रमुख गोकुळ ठुबे, माजी सरपंच मधुकर साळवे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती माजी तालुकाअध्यक्ष बाळासाहेब दौंडे,अशोक दौंडे, मधुकर ढोकळे, संतोष ढोकळे, सुकदेव ढोकळे, विलास दुनबळे, आप्पा गोधडे, रघुनाथ काळे, बापु पोटे, प्रविण काळे, शंकर काळे, दत्तु पोटे, सुनिल ढोकळेआदींनी केली आहे.कोट...जवळपास तीन-चार एकर कांद्याची लागवड केली. परंतु सध्या मात्र विहिरींनी तळ गाठल्याने दोन पाण्यावर अवलंबून असलेले कांदे होरपळून निघत नसल्याने माझ्या तोंडचे पाणीच पळाले आहे. तात्काळ पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची दखल घेऊन पाणी सोडावे.-अशोक दौंडे, शेतकरी.(०७ पिपळगाव लेप)पिंपळगाव लेप परिसरात पाण्याअभावी होरपळून निघालेले फ्लॉवरचे पिक.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणी