शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

सत्ताधाऱ्यांसोबत, विरोधकांच्याही प्रचारसभा उधळून लावू, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:29 IST

 कोणत्याही राजकीय पक्षाच्या केंद्र व राज्य सरकाने कायमस्वरुपी उपाय योजना केलेली नसल्याने कांदा उत्पादकांवर सातत्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम स्वरुपी तोडगा काढावा, आणि त्यासाठी विरोधी पक्षांनीही सरकारवर दबाव आणून सहकार्य करावे अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी फिरू देणार नाही. तसेच विवध पक्षांकडून होणाऱ्या प्रचारसभाही उधळून लावून असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोमवारी (दि.11) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे. 

ठळक मुद्देकांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काढाकांद्याचा प्रश्न सोडवला नाही, तर प्रचारसभा उधळून लावूकांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा राजकीय पक्षांना इशारा

नाशिक : गेल्या चार दशकांपासून कांदा प्रश्नावर  कोणत्याही राजकीय पक्षाच्या केंद्र व राज्य सरकाने  कायमस्वरुपी उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांवर सातत्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने कांदा प्रश्नावर लोकसभा निवडणुकांपूर्वी कायम स्वरुपी तोडगा काढावा, आणि त्यासाठी विरोधी पक्षांनीही सरकारवर दबाव आणून सहकार्य करावे अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकांच्या  प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी फिरू देणार नाही. तसेच विवध पक्षांकडून होणाऱ्या प्रचारसभाही उधळून लावून असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सोमवारी (दि.11) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.  राज्यात कांदा हे पीक अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकमेव नगदी पीक असून अधिच संकटात असलेल्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अर्थचक्र हे कांदा बाजारभावाच्या चक्रावर अवलंबून असते. परंतु केवळ शहरी ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावयक वस्तुंच्या यादीत टाकून सरकार कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यात धोरणात धरसोड वृत्ती होऊन कांदा उत्पादकांना केंद्र व राज्य सरकारने वाºयावर सोडल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भविष्य भविष्य निसर्ग व  सरकारी यंत्रणा यांच्या लहरीपणावर अवलंबून आहे. असे असताना सरकारने कांदा जीवनावश्यक वस्तुंमध्ये टाकून शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कांदा उत्पादन वाढले तर शेतकऱ्यांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. परंतु. भाव वाढले तर सरकार बाजारबेठेत हस्तक्षेप करून निर्यातीवर बंधन आणते असा प्रकार थांबविण्यासोबत कांद्याच्या प्रश्वावर सरकारने कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी संघटना शेतकºयांमध्ये उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी तसेच बाजारपेठेविषयी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी संघटनेचे खंडेकराव दिघोळे, अतुल गिते आदी उपस्थि होते.    

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिकonionकांदाFarmerशेतकरीPoliticsराजकारण