शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांविषयी कॉँग्रेसची भूमिका दुटप्पी : नरेंद्र मोदी यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:30 IST

महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते.

पिंपळगाव : महागाई थोडी वाढली की काँग्रेस मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभी राहून एकप्रकारे शेतकरीविरोधी भूमिका घेते व शेतमालाचे दर कोसळले की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असे म्हणून जनतेच्या नावे खडे फोडते. कॉँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची असून, शेतकºयांच्या मालाला भाव न देणाºया दलालांना मात्र कॉँग्रेसने कायमच संरक्षण दिले. रालोआ सरकारने शेतकरी व ग्राहक या दोघांचा विचार करून त्यांच्या आड येणाºया दलालांचा गेल्या पाच वर्षांत बीमोड करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी (दि. २२) आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. आपल्या अर्धातासांच्या घाणाघाती भाषणात पंतप्रधान मोदी यांनी, आपले सरकार देशातील भ्रष्टाचार, आतंकवाद नष्ट करून विकासाच्या दृष्टीने एकेक पाऊल पुढे टाकत असल्यामुळे काही लोकांना विजेचा झटका बसू लागला असून, देशात दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याने त्यांनी आता मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षांत जागतिक पातळीवर भारताची प्रतिष्ठा व ताकद आपल्या सरकारने वाढविली असून, कोणत्याही राष्टÑाच्या डोळ्यात डोळा घालून बोलण्याची हिंमत प्रत्येक भारतीयांत निर्माण करण्यास आपण यशस्वी झाल्याचे सांगून मोदी यांनी श्रीलंकेत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा संदर्भ देत, शेजारील राष्टÑांमध्ये दररोज बॉम्बस्फोट होत असताना भारतात मात्र सर्वत्र शांतता आहे. कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या काळात देशात दररोज कुठे ना कुठे बॉम्बस्फोट होत असे व अतिरेक्यांचा बीमोड करण्याऐवजी फक्त जागतिक पातळीवर श्रद्धांजली सभा वाहून पाकिस्तानच्या नावाने रडण्यापलीकडे काहीच केले नाही. आपल्या सरकारने कॉँग्रेसच्या काळातील डरपोक नीतीला बदलून टाकले असून, त्यामुळेच आतंकवाद आता फक्त जम्मू-श्रीनगरच्या विशिष्ट कोपºयापुरता सीमित झाला आहे. अतिरेक्यांनाही आता माहीत झाले आहे की पाताळातून आपले सरकार त्यांचा शोध घेऊन शिक्षा देईल. त्यामुळे त्यांच्या कारवाया थंडावल्याचा दावाही मोदी यांनी केला.शेतकºयांच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी, शेतकºयाला बी-बियाणे देण्यापासून ते त्याच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंतची व्यवस्था आपल्या सरकारने निर्माण केली असून, शेतकºयांच्यामालाला दीडपट भाव देऊन किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना दरवर्षी अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होताच, या योजनेंतर्गत पाच एकर जमिनीची असलेली अट दूर करण्यात येईल, असे जाहीर केले. कांद्याच्या भावाविषयी बोलताना मोदी यांनी, कांद्याच्यानिर्यातीला येणाºया वाहतूक खर्च कमी करण्यात येईल, असे सांगितले.येत्या पाच वर्षांत ड्रायपोर्ट, बंदरे विकास, महामार्गाचे विस्तारीकरण, उडान योजनेंतर्गत प्रत्येक गाव हवाई सेवेशी जोडण्यात येणार असून, तीन पैकी प्रत्येक एक लोकसभा मतदारसंघात एक वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणाही मोदी यांनी केली. सकाळी ११ वाजता मोदी यांच्या सभेचे नियोजन होते. परंतु मोदी तब्बल एक तास उशिराने सभास्थळी दाखल झाले. त्यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर नाशिक जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते येवल्याचा फेटा देऊन मोदी यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांसह पक्षाचे पदाधिकारी व आमदार राहुल अहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, अनिल कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.नाशिकचा गौरवोल्लेखपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताच उपस्थितांनी दाद दिली. ते म्हणाले, ‘येथे जमलेल्या सर्व नाशिककरांना माझा नमस्कार. नाशिकच्या पुण्यभूमीतयेऊन मी धन्य झालो’. त्यानंतर त्यांनी हिंदीतून सुरुवात केली. ते म्हणाले, नाशिकचे नाव घेतले की, संस्कृतीचे सप्तरंग दिसू लागतात. त्यात पहिला रंग आहे आदिमाया सप्तशृंगी देवीचा, दुसरा सिंहस्थ कुंभमेळ्याचा, तिसरा ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वराचा, चौथा भगवान श्रीराम व सीतेच्या वास्तव्याचा, पाचवा अंजनीसुत हनुमानाच्या अंजनेरीच्या जन्मभूमीचा, सहावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा व सातवा समतेचा सत्याग्रह करणाºया डॉ. आंबेडकरांचा. या सात रंगांनी नाशिकचे तीर्थक्षेत्र नटलेले असल्याचे मोदी यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.कॉँग्रेस अफवा पसरवतेआपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम वाहिन्यांच्या पाण्याचा विषय छेडून, नाशिक जिल्ह्यातील काही नद्यांचे पाणी अन्यत्र पळविण्यात येणार असल्याची अफवा कॉँग्रेस पसरवित असल्याचा आरोप केला. परंतु आपले सरकार स्थानिक जनतेच्या मनाविरुद्ध कोणताही निर्णय घेणार नाही, असे सांगून एचएएलच्या बाबतीतदेखील काँग्रेसने अपप्रचार चालविला आहे. सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून एचएएलला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा वर्षांत एचएएलची ताकद तिप्पटीने वाढलेली दिसेल, असा दावाही मोदी यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा