शेतीला दिवसा वीज मिळण्यासाठी सटाण्यात ‘प्रहार’चा रास्ता रोकोचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST2020-12-04T04:40:18+5:302020-12-04T04:40:18+5:30
दि. १ डिसेंबरपासून शेतीसाठी विजेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र या वेळापत्रकात शेतीला आठवड्यातून दिवसा तीन ते चार ...

शेतीला दिवसा वीज मिळण्यासाठी सटाण्यात ‘प्रहार’चा रास्ता रोकोचा प्रयत्न
दि. १ डिसेंबरपासून शेतीसाठी विजेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र या वेळापत्रकात शेतीला आठवड्यातून दिवसा तीन ते चार दिवसच वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे या भागातील रब्बी हंगामातील मुख्य पीक कांदा, गहू, हरभरा आणि उसाची लागवड संकटात सापडली आहे. वास्तविक शेतीच्या कामासाठी मजूर दिवसा कामाला येतात, असे असताना वीज कंपनीकडून रात्री वीजपुरवठा केल्यामुळे पाण्याअभावी कांदा आणि ऊस लागवडीबरोबरच गहू, हरभरा पेरण्या संकटात सापडल्या आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी येथील मोरेनगरच्या वीज कंपनीच्या कार्यालयासमोर शिर्डी-साक्री महामार्गावर ठिय्या देऊन रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहारचे आंदोलन हाणून पाडले. दरम्यान, उपअभियंता अभिजित अहिरे यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, सुधाकर पाटील, राजू पाटील, तुषार खैरनार, कपिल सोनवणे, राजाभाऊ जगताप, दादाजी ह्याळीज, कैलास निकम, दशरथ पूरकर, भाऊसाहेब मोरे, महेंद्र खैरनार, राजेंद्र देवरे, कृष्णा जगताप, हिंमत माळी, किरण मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्य सरकार दिवसा शेतीला आठ तास वीज देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तीही हवेत विरली. राज्य सरकारने शेतकर्यांच्या जिवाशी न खेळता दिवसा शेतीला दिवसा वीज द्यावी अन्यथा या प्रश्नी शेतकर्यांसाठी प्रहारच्या आंदोलनात सहभागी होऊ.
- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण
===Photopath===
031220\03nsk_24_03122020_13.jpg
===Caption===
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने सटाणा येथे शिर्डी-साक्री महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करतांना कार्यकर्ते.०३ सटाणा २