शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली,

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, परंतु पक्षाला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच त्यांचे निर्वाण झाले. त्यानंतर ३ आॅक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर वर्षभरातच हा पक्ष फुटला आणि फाटाफुटीची बीजे तेव्हापासूच रुजली.१९४२मध्ये स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युलकास्ट फेडरेशन पक्षाने १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. १९५२च्या निवडणुकीत मात्र १२ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे रूपांतर पुढे रिपब्लिकन पक्षात झाले. मात्र अल्पावधीतच रिपब्लिकन पक्षातील फूट पडली आणि ती कायमच राहिली. १९५८ मध्ये फुटलेला रिपब्लिकन पक्ष पुढे १९६४ आणि १९६५ मध्ये सातत्याने फुटत गेला. जवळपास ३२ गटांमध्ये हा पक्ष विखुरला गेला आहे.सत्तेतील सहभागासाठी रिपाइंच्या एकीकरणासाठी समाजाने पुढाकार घेतला आणि जनतेच्या रेट्यामुळे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रा. सू. गवई हे सारे नेते एकत्र आले. १९९८मध्ये झालेल्या एकीकरणाच्या प्रयोगामुळे चौघेही लोकसभेत निवडून गेले. मात्र या दलित नेत्यांची वैचारिक भूमिका आणि राजकीय महत्त्वाकांक्षा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. त्यामुळे मधल्या काळातील ऐक्य अल्पायुषीच ठरत गेले. रिपाइं नेत्यांची वैयक्तिक भूमिका सातत्याने समोर आली असली तरी भिन्न पक्ष तसेच स्वपक्षाच्या माध्यमातून या नेत्यांनी रिपब्लिकनचा दबदबा कायम ठेवला. या पक्षामागे त्या नेत्याचे नाव जोडले गेले असले तरी सत्ता संपादनाच्या केंद्रस्थानी हे नेते कायम राहिले.विदर्भात कवाडे यांचे अस्तित्व आणि विद्यमान आमदार, आठवले हे केंद्रात मंत्री तर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्ह्यात आणि राज्यात या नेत्यांची ताकद कमी-अधिक प्रमाणात कायम असून त्याची दखल प्रत्येक सत्ताधाऱ्याला घ्यावीच लागली आहे.वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांचे राज्यातील महत्त्व वाढले आहे. तर केंद्रात मंत्री असलेल्या आठवले यांचे नाशिक जिल्ह्यात मोठे प्राबल्य आहे. १७२ उपसरपंच, १८५ सरपंच, २७ नगरसेवक, मनमाडचे नगराध्यक्षपद, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्षपद, नाशिक मनपात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने रिपाइंचा उमेदवार आहे. आठवले आणि आंबेडकर यांनी आपल्या गटाचे उमेदवार विधानसभेत उतरवून अस्तित्व कायम ठेवले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक