शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

सत्तेच्या राजकारणापर्यंत रिपाइंची मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली,

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया पक्षाला स्थापनेपासूनच बंडखोरी आणि फुटीचा इतिहास आहे. डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली, परंतु पक्षाला मूर्तस्वरूप येण्यापूर्वीच त्यांचे निर्वाण झाले. त्यानंतर ३ आॅक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर वर्षभरातच हा पक्ष फुटला आणि फाटाफुटीची बीजे तेव्हापासूच रुजली.१९४२मध्ये स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युलकास्ट फेडरेशन पक्षाने १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. १९५२च्या निवडणुकीत मात्र १२ खासदार लोकसभेत निवडून गेले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे रूपांतर पुढे रिपब्लिकन पक्षात झाले. मात्र अल्पावधीतच रिपब्लिकन पक्षातील फूट पडली आणि ती कायमच राहिली. १९५८ मध्ये फुटलेला रिपब्लिकन पक्ष पुढे १९६४ आणि १९६५ मध्ये सातत्याने फुटत गेला. जवळपास ३२ गटांमध्ये हा पक्ष विखुरला गेला आहे.सत्तेतील सहभागासाठी रिपाइंच्या एकीकरणासाठी समाजाने पुढाकार घेतला आणि जनतेच्या रेट्यामुळे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर आणि रा. सू. गवई हे सारे नेते एकत्र आले. १९९८मध्ये झालेल्या एकीकरणाच्या प्रयोगामुळे चौघेही लोकसभेत निवडून गेले. मात्र या दलित नेत्यांची वैचारिक भूमिका आणि राजकीय महत्त्वाकांक्षा भिन्न असल्यामुळे प्रत्येकाने आपला मार्ग निवडला. त्यामुळे मधल्या काळातील ऐक्य अल्पायुषीच ठरत गेले. रिपाइं नेत्यांची वैयक्तिक भूमिका सातत्याने समोर आली असली तरी भिन्न पक्ष तसेच स्वपक्षाच्या माध्यमातून या नेत्यांनी रिपब्लिकनचा दबदबा कायम ठेवला. या पक्षामागे त्या नेत्याचे नाव जोडले गेले असले तरी सत्ता संपादनाच्या केंद्रस्थानी हे नेते कायम राहिले.विदर्भात कवाडे यांचे अस्तित्व आणि विद्यमान आमदार, आठवले हे केंद्रात मंत्री तर प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत. जिल्ह्यात आणि राज्यात या नेत्यांची ताकद कमी-अधिक प्रमाणात कायम असून त्याची दखल प्रत्येक सत्ताधाऱ्याला घ्यावीच लागली आहे.वंचितच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांचे राज्यातील महत्त्व वाढले आहे. तर केंद्रात मंत्री असलेल्या आठवले यांचे नाशिक जिल्ह्यात मोठे प्राबल्य आहे. १७२ उपसरपंच, १८५ सरपंच, २७ नगरसेवक, मनमाडचे नगराध्यक्षपद, इगतपुरीचे उपनगराध्यक्ष, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्षपद, नाशिक मनपात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने रिपाइंचा उमेदवार आहे. आठवले आणि आंबेडकर यांनी आपल्या गटाचे उमेदवार विधानसभेत उतरवून अस्तित्व कायम ठेवले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक