शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याला परतीच्या पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 5:48 PM

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या परतीच्या पावसाने दोन दिवसात सोंगणीस आलेल्या मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव सुरु होता. त्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीने भर टाकली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वात खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा रोपे तर भुईसपाट झाली असून मक्याच्या कापणीची कामे सुरु असताना वादळी वाºयासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, मक्याचा चारा तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा मका भुईसपाट झालेला आहे. कापणी केलेल्या मक्याच्या कणसांच्या ढिगात पाणी शिरल्याने त्या मक्याला कणसे उगण्याची भीती व्यक्त होतआहे. परिसरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला पिकांनाही बसला. चार महिने राबराब राबून घेतलेल्या पिकांचे ऐन काढणी व कापणीच्या वेळेस झालेल्या नुकसानीने बागलाण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस