शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

देशाला कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:38 IST

महाराष्टÑवगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले, अशा वेळी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागणी तितका पुरवठा या बाजारपेठेच्या सूत्राचा आधार घेतला.

नाशिक : महाराष्टÑवगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले, अशा वेळी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागणी तितका पुरवठा या बाजारपेठेच्या सूत्राचा आधार घेतला. परिणामी गेल्या महिन्यापासून देशांतर्गत सर्वच राज्यांना कांदा पुरविण्याची जबाबदारी एकट्या नाशिक जिल्ह्यावर येऊन पडली. आगामी दीड महिन्यात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा आपली तेजी राखणार असला तरी, भाव चांगला मिळू लागल्याने वाढलेल्या आवकेमुळे कांद्याच्या भावात काही प्रमाणात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. जेवणात सर्वांनाच हवाहवासा वाटणारा कांद्याचा दर जसा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो, तसाच तो सरकारसाठीही कायम डोकेदुखी ठरतो. कांद्याचे दर घसरले तर शेतकºयांचा रोष व भाववाढ झाली तर ग्राहकांचा दबाव ठरलेला असल्याने यंदा आॅगस्ट महिन्यात कांद्याने घेतलेल्या तेजीचा धसका थेट केंद्र सरकारनेच घेतला. त्यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशिकला भेट देऊन कांद्याची सद्यस्थिती जाणून घेत, बाजारातील चढ-उताराची दैनंदिन माहिती घेण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्ह्णातून यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १७२ रेल्वेच्या रेकमधून कांदा हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश व बिहार या प्रमुख राज्यांमध्ये पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण अवघे ४७ रेक इतके होते. सर्वच राज्यांतून नाशिक जिल्ह्णातील कांद्याला मागणी कायम आहे.कांद्याची टंचाई जाणवणार नाहीएकाच महिन्यात कांद्याचे सरासरी भाव १३०० रुपयांनी गडगडले आहे. मागील महिन्यात कांद्याचे २८०० रुपये क्विंटल असलेले भाव कालपर्यंत १५०० रुपये क्ंिवटलवर स्थिरावले आहेत. कांद्याच्या किमान हमीभावाचा विचार केला, तर कांद्याला एका क्विंटलला साधारणत: ९०० रुपये खर्च येतो. किमान हमीभाव ५० टक्के धरला, तर ४५० रुपये अधिक ९०० मिळून कांद्याला किमान हमीभाव १३५० रूपये जातो. आजमितीस सरासरी कांदा १५०० रुपये क्ंिवटल दराने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत नसून स्थिर आहेत. जिल्ह्णातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची दररोजची आवक सुमारे सव्वादोन ते अडीच लाख क्विंटल आहे. गेल्या दोन वर्षांत कांदा उत्पादकाने तोट्यातच कांदा विकला आहे. यंदा कधी नव्हे ते दोन पैसे शेतकºयाला मिळू लागले आहेत. त्यामुळे सरकारने तेही लक्षात घेतले पाहिजे. मध्य प्रदेश सरकारने ८०० रुपये किमान हमीभावाने कांदा खरेदी केल्याने मध्य प्रदेशातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री केला. आता दक्षिणेतून लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. मध्यंतरी महापुरामुळे गुजरात व राजस्थानचा कांदा बाजारात आला नाही. मात्र कांद्याची जिल्ह्णात व राज्यात आवक चांगली असून, कोणतीही टंचाई तूर्तास तरी जाणवणार नाही. कधी तरी भाववाढ झाली म्हणून लगेचच कमिटी पाठवून केंद्र सरकारने अहवाल मागविण्याचा प्रकार म्हणजे, ‘आग सोमेश्वरी अन्् बंब रामेश्वरी’ पाठविण्याचा आहे. सरकारने कांद्याला किमान हमीभावाचा दर लक्षात घेणे आवश्यक आहे.