शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 23:11 IST

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा

देवळा : चणकापूर धरणातील पाण्याचे आवर्तन चणकापूर उजव्या कालव्याला सोडून देवळा तालुक्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे मटाणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली.

मटाणे गावातील शेतकऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांची देवळा येथे भेट घेऊन तालुक्यातील पाणीटंचाईबाबत माहिती दिली तसेच चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, देवळा तालुक्यात चणकापूर उजव्या कालव्यालगत असलेल्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे आगामी काळात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आतापासूनच वणवण भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून चणकापूर उजव्या कालव्यास पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब आहेर, अनिल पगार, संभाजी पवार, भगवान आहेर, समाधान आहेर, राहुल केदारे, कैलास आहेर, योगेश आहेर, दादाजी आहेर, मनोज आहेर, गुलाब आहेर, कैलास बोरसे, पोपट पवार, विठोबा देवरे, सतीश देवरे, आबा आहेर, चंद्रकांत आहेर, अविनाश आहेर, जनार्दन पाटील, संजय आहेर, शरद वाघ, शैलेंद्र आहेर आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढापरिसरातील सर्व विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. कालव्याला निश्चित आवर्तन नसल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पाण्याचे वेळापत्रक कोलमडते. पिकांचे नियोजन करता येत नाही, अशा तक्रारी यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. दरम्यान, दोन-तीन दिवसात कालव्याला आवर्तन सोडण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिले. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईFarmerशेतकरी