शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कांद्याची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:20 IST

दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी व्यस्त। ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव

खेडलेझुंगे : दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.निफाड तालुक्यातील रुई, धानोरा, कोळगाव, खेडलेझुंगे, धरणगाव, सारोळेथडी आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना उजाडला तरी कांदा लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब होऊन सडून गेली होती. अवकाळी पावसाने एकदा नव्हे, तब्बल तीनदा टाकलेली रोपे सडली. सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड न करता रोपे महागड्या दराने विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि टिकून असलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवडीवर शेतकरीवर्गाने अधिक भर दिला आहे.एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समितीत कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे आणून लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. महिनाभरापासून निफाड तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ तर कधी कडक ऊन, पहाटे धुके, रात्री वाहणारे थंड वारे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.मजुरांची टंचाईखेडलेझुंगे, रुई-धानोरे, धारणगाव, कोळगाव, कानळद आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने विकत आणलेली रोपे खराब होत चालली आहे. सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहेत. सध्या कांदा लागवडीचा एकरी दर नऊ ते अकरा हजारांपर्यंत पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आयात करताना दिसत आहे.पूर्वी कांद्यावर कोणताही रोग येत नव्हता, परंतु सततच्या वातावरणातील बदलामुळे कांद्यावरही रोगराई वाढली आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. वाढलेला खर्चाचा आकडा बघता कांद्याचे वाढलेले दर फायद्याचे दिसून येत नाही. कारण वाढलेला उत्पादन खर्च आणि विक्र ी दर यामुळे उत्पन्नाची सरासरी सारखीच येत आहे.- प्रमोद गिते, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा