शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:20 IST

दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी व्यस्त। ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव

खेडलेझुंगे : दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.निफाड तालुक्यातील रुई, धानोरा, कोळगाव, खेडलेझुंगे, धरणगाव, सारोळेथडी आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना उजाडला तरी कांदा लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब होऊन सडून गेली होती. अवकाळी पावसाने एकदा नव्हे, तब्बल तीनदा टाकलेली रोपे सडली. सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड न करता रोपे महागड्या दराने विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि टिकून असलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवडीवर शेतकरीवर्गाने अधिक भर दिला आहे.एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समितीत कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे आणून लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. महिनाभरापासून निफाड तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ तर कधी कडक ऊन, पहाटे धुके, रात्री वाहणारे थंड वारे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.मजुरांची टंचाईखेडलेझुंगे, रुई-धानोरे, धारणगाव, कोळगाव, कानळद आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने विकत आणलेली रोपे खराब होत चालली आहे. सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहेत. सध्या कांदा लागवडीचा एकरी दर नऊ ते अकरा हजारांपर्यंत पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आयात करताना दिसत आहे.पूर्वी कांद्यावर कोणताही रोग येत नव्हता, परंतु सततच्या वातावरणातील बदलामुळे कांद्यावरही रोगराई वाढली आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. वाढलेला खर्चाचा आकडा बघता कांद्याचे वाढलेले दर फायद्याचे दिसून येत नाही. कारण वाढलेला उत्पादन खर्च आणि विक्र ी दर यामुळे उत्पन्नाची सरासरी सारखीच येत आहे.- प्रमोद गिते, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा