शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

कांद्याची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:20 IST

दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी व्यस्त। ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव

खेडलेझुंगे : दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.निफाड तालुक्यातील रुई, धानोरा, कोळगाव, खेडलेझुंगे, धरणगाव, सारोळेथडी आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना उजाडला तरी कांदा लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब होऊन सडून गेली होती. अवकाळी पावसाने एकदा नव्हे, तब्बल तीनदा टाकलेली रोपे सडली. सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड न करता रोपे महागड्या दराने विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि टिकून असलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवडीवर शेतकरीवर्गाने अधिक भर दिला आहे.एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समितीत कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे आणून लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. महिनाभरापासून निफाड तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ तर कधी कडक ऊन, पहाटे धुके, रात्री वाहणारे थंड वारे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.मजुरांची टंचाईखेडलेझुंगे, रुई-धानोरे, धारणगाव, कोळगाव, कानळद आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने विकत आणलेली रोपे खराब होत चालली आहे. सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहेत. सध्या कांदा लागवडीचा एकरी दर नऊ ते अकरा हजारांपर्यंत पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आयात करताना दिसत आहे.पूर्वी कांद्यावर कोणताही रोग येत नव्हता, परंतु सततच्या वातावरणातील बदलामुळे कांद्यावरही रोगराई वाढली आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. वाढलेला खर्चाचा आकडा बघता कांद्याचे वाढलेले दर फायद्याचे दिसून येत नाही. कारण वाढलेला उत्पादन खर्च आणि विक्र ी दर यामुळे उत्पन्नाची सरासरी सारखीच येत आहे.- प्रमोद गिते, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा