शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कांद्याची विक्रमी लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:20 IST

दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी व्यस्त। ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव

खेडलेझुंगे : दोन महिन्यांपासून कांद्याचे दर चढत्या दराने टिकून असल्याने कांद्याचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.निफाड तालुक्यातील रुई, धानोरा, कोळगाव, खेडलेझुंगे, धरणगाव, सारोळेथडी आदी भागात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड शेतकरी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपासून शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिना उजाडला तरी कांदा लागवड सुरू असल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब होऊन सडून गेली होती. अवकाळी पावसाने एकदा नव्हे, तब्बल तीनदा टाकलेली रोपे सडली. सध्या कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवड न करता रोपे महागड्या दराने विकून आर्थिक प्राप्ती करून घेत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस आणि टिकून असलेल्या बाजारभावामुळे कांदा लागवडीवर शेतकरीवर्गाने अधिक भर दिला आहे.एकीकडे घरची रोपे सडून गेली तर दुसरीकडे बाजार समितीत कांद्याचे दर गगनाला भिडत असल्याने महागड्या किमतीने का होईना मिळेल तेथून रोपे आणून लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. महिनाभरापासून निफाड तालुक्यातील सर्वच भागात वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी ढगाळ तर कधी कडक ऊन, पहाटे धुके, रात्री वाहणारे थंड वारे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन कांदा लागवड धोक्यात आली असून, लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळे पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे.मजुरांची टंचाईखेडलेझुंगे, रुई-धानोरे, धारणगाव, कोळगाव, कानळद आदी भागात कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने विकत आणलेली रोपे खराब होत चालली आहे. सर्वत्र कांदा लागवड सुरू असल्याने मजुरीचे दरही वाढलेले आहेत. सध्या कांदा लागवडीचा एकरी दर नऊ ते अकरा हजारांपर्यंत पोहोचला आहे. ज्या ठिकाणी मजूर उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी शेतकरी जादा पैसे देऊन मजूर आयात करताना दिसत आहे.पूर्वी कांद्यावर कोणताही रोग येत नव्हता, परंतु सततच्या वातावरणातील बदलामुळे कांद्यावरही रोगराई वाढली आहे. त्यामुळे खर्चातही वाढ झालेली आहे. वाढलेला खर्चाचा आकडा बघता कांद्याचे वाढलेले दर फायद्याचे दिसून येत नाही. कारण वाढलेला उत्पादन खर्च आणि विक्र ी दर यामुळे उत्पन्नाची सरासरी सारखीच येत आहे.- प्रमोद गिते, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा