शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

रणरणत्या उन्हात टँकरपुढे रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:27 AM

गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नाशिक : गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे या केंद्रावरून पुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये बुधवारी (दि. ४) अचानकपणे पाणीबंदीचे संकट ओढवले आहे. दुपारी बारा वाजेपासून या भागात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ लागल्याने रणरणत्या उन्हात हंडे घेऊन महिलांना टॅँकरपुढे रांगा लावाव्या लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले.  गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला मागील काही दिवसांपासून गळती लागली असेल मात्र महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या सदर बाब उशिरा लक्षात आली असावी, असे संतप्त महिलांनी सांगितले. जलवाहिनी दुरुस्ती मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत पूर्ण होऊ न शकल्यामुळे बुधवार ‘कोरडा दिवस’ ठरला. गुरुवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे. भर उन्हाळ्यात वडाळागाव परिसरात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. सकाळी वडाळागावातील दैनंदिन पाणीपुरवठा संपूर्णपणे खंडित झाल्याने नळ कोरडेठाक पडले होते. सकाळी सात ते अकरा वाजेच्या वेळेत वडाळागावसारख्या गावठाण व दाट लोकवस्तीच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टॅँकर पुरविण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून परिसरनिहाय होणे अपेक्षित होते; मात्र दुपारी नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यानंतरटॅँकर गावात सुरू झाले. परिणामी कमाल तपमानाचा पारा चाळिशीच्या जवळ पोहचलेला असताना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ‘चटके’ सहन करण्याची वेळ महिलांवर ओढवली. त्यामुळे वडाळागाव परिसरातील महिलांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुपारी बारा वाजेनंतर वडाळागावात दोन टॅँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली होती.या भागांना फटकाप्रभाग १६ मधील उपनगर (शांतीपार्क) ते रामदास स्वामीनगरचा परिसर, प्रभाग १८ मधील नारायणबापूनगर ते दसक गाव, प्रभाग १८ मधील शिवाजीनगर ते शिवशक्तीनगर परिसर, प्रभाग १९ मधील गोरेवाडी ते सामनगाव, प्रभाग २० मधील जयभवानीरोड ते बिटको कॉलेज परिसर व आर्टिलरी सेंटर रोड, प्रभाग २२ मधील विहितगाव ते वडनेररोड व प्रभाग २३ मधील दीपालीनगर ते साईनाथनगर, वडाळारोड परिसरासह गावठाण भागात पाणी पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.पाण्याचे दुर्भिक्ष; उन्हाच्या झळा अन् महिलांची वणवणवडाळागावात दाट लोकवस्ती असून, लहान घरे असल्यामुळे रहिवाशांना पाणीसाठा करणे जिकिरीचे होते. जलवाहिनी दुरुस्तीचे अचानकपणे काम वाढल्याने बुधवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणीपुरवठा विभागाने सकाळच्या सुमारास टॅँकर वडाळागावात पाठविणे गरजेचे होते; मात्र दुपारी संबंधित लोकप्रतिनिधींकडे नागरिकांनी ओरड केल्यानंतर टॅँकर गावात पोहचले. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागला.

टॅग्स :Waterपाणी