शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 7:55 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या,

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे, रखडलेल्या शासकीय योजनांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात येऊन कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचीही धावपळ उडणार आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, आदिवासी आयुक्त कार्यालय ते सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला होता. कोणत्याही नवीन कामांना मंजुरी बंद करण्यात आली, त्याचबरोबर व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजनांनाही थंड बस्त्यात बांधून ठेवण्यात आले. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य वर्ज्य करण्यात आल्यामुळे कामे ठप्प झाली होती. चालू वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच प्रशासनाने नवीन कामांची घाई सुरू करताच, पुन्हा दोनच महिन्यांत निवडणूक आचारसंहितेचे सावट विकासकामांवर आले. साधारणत: दीड महिने विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. जिल्हा नियोजन समितीने यंदा कोट्यवधी रुपयांची तरतूद विकासकामांसाठी करून ठेवली असून, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्षातील पाच महिने कोणतेही कामकाज शासकीय यंत्रणेला करता आलेले नाही. त्यामुळे आगामी पाच महिन्यांत शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे त्याचबरोबर अपूर्ण कामे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आणल्याचे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र त्यांनी ३० आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येत असल्याचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे. आयोगाचे पत्र प्राप्त होताच, शासकीय कार्यालयातील विकासकामांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीदेखील मतदारसंघातील पूर्ण, अपूर्ण तसेच नवीन कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद