आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 07:55 PM2019-10-31T19:55:05+5:302019-10-31T19:56:39+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या,

Ran the Code of Conduct; Now hurry to work | आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

आचारसंहिता संपली; आता कामांची घाई

Next
ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : लोकप्रतिनिधींचा मार्ग मोकळा लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता अखेर संपुष्टात आली असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे पाच महिने शिल्लक असल्याने आता शासकीय पातळीवर कामांची घाई सुरू झाली आहे. आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली कामे, रखडलेल्या शासकीय योजनांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात येऊन कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींचीही धावपळ उडणार आहे.


राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले असले तरी, त्यासाठी २१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जारी केली होती. त्यामुळे आचारसंहिता जारी झाल्यापासून महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, आदिवासी आयुक्त कार्यालय ते सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम झाला होता. कोणत्याही नवीन कामांना मंजुरी बंद करण्यात आली, त्याचबरोबर व्यक्तिगत व सार्वजनिक लाभाच्या योजनांनाही थंड बस्त्यात बांधून ठेवण्यात आले. मतदारांवर प्रभाव पडेल असे कोणतेही कृत्य वर्ज्य करण्यात आल्यामुळे कामे ठप्प झाली होती. चालू वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जवळपास तीन महिने निवडणूक आचारसंहिता जारी असल्यामुळे जिल्ह्यातील विकासकामे रखडली होती. लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच प्रशासनाने नवीन कामांची घाई सुरू करताच, पुन्हा दोनच महिन्यांत निवडणूक आचारसंहितेचे सावट विकासकामांवर आले. साधारणत: दीड महिने विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. जिल्हा नियोजन समितीने यंदा कोट्यवधी रुपयांची तरतूद विकासकामांसाठी करून ठेवली असून, निवडणूक आचारसंहितेमुळे वर्षातील पाच महिने कोणतेही कामकाज शासकीय यंत्रणेला करता आलेले नाही. त्यामुळे आगामी पाच महिन्यांत शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे त्याचबरोबर अपूर्ण कामे, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची कसोटी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने २५ आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आणल्याचे पत्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविले होते. मात्र त्यांनी ३० आॅक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येत असल्याचे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांना कळविले आहे. आयोगाचे पत्र प्राप्त होताच, शासकीय कार्यालयातील विकासकामांच्या फाईलींवरील धूळ झटकण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनीदेखील मतदारसंघातील पूर्ण, अपूर्ण तसेच नवीन कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Ran the Code of Conduct; Now hurry to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.