शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रमाई आवासचा अवघा एकच पूर्ण लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:08 AM

राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे.

नाशिक : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती व नवबौद्धांना निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई आंबेडकर आवास योजनेची वासलात लागली असून, या योजनेत अंतिमत: घरकुल उभारलेल्या एकाच लाभार्थीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे. संपूर्ण योजनेत ३३ कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्यातील केवळ २१ लाभार्थींपर्यंत योजनेच्या  दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पोहोचले आहे. शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील गरिबांना त्यातही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी शासनाने रमाई आंबेडकर आवास योजना आखली आहे. ज्यांची स्वमालकीची झोपडी, कच्चे घर अथवा मोकळी जागा असेल त्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते.यासंदर्भात गेल्यावर्षी ७ जानेवारीस घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पात्र व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठीच नव्हे तर दुरु स्तीसाठी अडीच लाख रु पयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेकरिता शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ५६ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले असले तरी लाभार्थी निश्चित करण्यास महापालिका वेळखाऊपणा करीत असल्याने लाभेच्छुकांना लाभ मिळत नाही. तसेच या योजनेचा लाभ संंबंधितांपर्यंत पोहण्यास अडथळे निर्माण होत आहेत.३३ कुटुंबांनाच लाभसदरची योजना सुरू झाल्यापासून जेमतेम ३३ कुटुंबांनाच लाभ मिळाला आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख रुपयांचे अनुदान या ३३ कुटुंबांना मिळाले आहे. मात्र, २१ लाभार्थ्यांनाच योजनेच्या दुसºया टप्प्यातील ८० हजार रु पयांचे अनुदान मिळाले आहे. योजनेच्या उर्वरित २० हजारांच्या अनुदानाचा अंतिम टप्पा लाभार्थ्याने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर देणे असले तरी एकच लाभार्थी दाखला मिळवण्यापर्यंत पोहोचल्याने त्यालाच संपूर्ण अनुदानाचा पूर्ण लाभ मिळाला आहे.

टॅग्स :Homeघर