शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:28 IST

राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

नाशिक : राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.सिडको परिसरात तयार करण्यात आलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. यापार्श्वभूमीवर आव्हाड यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत प्रभू श्रीराम कुण्या एकाच्या सातबारावर नाहीत आणि तो सातबारा कुणाच्या मालकीचादेखील नसल्याचे विधान करीत भाजपवर निशाणा साधला. श्रीरामाच्या नावाने भक्ती करणे आणि राजकारण करणे वेगळे असून, भाजपने गेली ४० वर्षे श्रीरामाच्या नावानेच राजकारण केले, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.दरम्यान, प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक भूमितील आपण भूमिपुत्र असून, महाराष्ट्र कोरोनामुक्त होवो अशीच आपली प्रार्थना असल्याचे आव्हाड म्हणाले.या कार्यक्रमप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, नगरसेवक किरण गामणे, बाळा दराडे, सुधाकर बडगुजर, पुंजाराम गामने, महानगरप्रमुख महेश बडवे, दीपक गामने आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाड