शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

पाऊसाचा धुमाकूळ अन् शेतकऱ्यांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 21:06 IST

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.

ठळक मुद्देरोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे.

खामखेडा : नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवासापूर्वी बेमौसमी पावसाने तीन -चार दिवस धुमाकूळ घातल्याने शेती पिकांची धूळधाण झाली आहे. या पावसाने रब्बी पिकांची आशा उंचावेल आशी चर्चा होत असली तरी खरीपाचे नुकसान झाले ते भरून निघणारे नाही.खरीपाच्या प्रारंभापासून पावसाने शेतकऱ्यांची कसोटी पाहिली आहे. आता या कसोटीला उतरलेल्या शेतकºयांची खरी परीक्षा या निसर्गाच्या लहरीपणा पाहात आहे.गेल्या पंधरा दिवासापूर्वी अचानक वातावरणात बदल होऊन बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले. त्यामुळे हताशी आलेल्या खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुरवातीला मुळातच पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले, धरणे कोरडे होते. त्यामुळे भुगर्भातील जलाशयाच्या पातळीत वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नव्हती.दर वर्षी दिवाळी आधी खरीप पिकांची काढणी होत असे तसेच दिवाळी अगोदर पोळ कांद्याची काढणी होऊन कांदा दिवाळी पूर्वी विकला जात असे. परंतु चालु वर्षी पावसाअभावी लाल कांद्याची उशिरा लागवड झाल्याने दिवाळी नंतर लाल कांदा तयार होणार आहे. जो काही लवकर लागवड झाला आहे. तो अजूनही काढणीसाठी वेळ आहे.या अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात कांद्याच्या वाफ्यात पाणी साचू लागल्याने शेतातील उभा काढणीस आलेला कांदा शेतातच सडण्याची शक्यता असते. तेव्हा कांद्यावर केलेला खर्च भरून निघतो की नाही यांची चिंता बळीराजा पडली आहे.खामखेडा परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून उन्हाळी कांद्याकडे पाहिले जाते. शेतकºयाकडे खरीपाचा कांदा फारसा नाही. त्यामुळे दिवाळी नंतर आहे त्या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवडीची शेतकरी तयारी करीत असतो.मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या बेमोसमी पाऊसाने लागवडीस आलेले व अत्यंत नाजुक असे रोपे आता पिवळी पडू लागल्याने खराब होऊ लागली आहे. आता पर्यत शेतकºयाने दोन वेळा उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकली. परंतु या पाऊसाने ती ती तग धरु शकली नाहीत. त्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच चालु वर्षी उशिरा पावसामुळे खरीपाच्या पेरणी उशिरा झाल्याने बाजरी, मका आदि पिकांची कापणी उशिरा झाल्याने शेतात उघड्यावर पडलेला मका व बाजरीचा कडबा या अवकाळी बेमोसमी पावसामुळे भीजुन गेल्याने तो काळा पडून शेतात सडून गेल्याने चाºयाची टंचाई आतापासून शेतकºयाला भासू लागली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतीमालाची धूळधाण केली आहे. त्यामुळे आता पुढील नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी