शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

निफाड तालुक्यात रिमझिम पाऊस, द्राक्ष पंढरीत उत्पादक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 11:42 IST

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळ पासून द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे आता, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.

सकाळपासूनच वातावरणात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळत आहे. एकीकडे थंडीचा घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारस पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्षउत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा  अतोनात नुकसान झाले होते. द्राक्ष बागाची कूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा  पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.  द्राक्ष आणि कांदा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कांदा जमिनीत खराब होऊ शकतो तर द्राक्ष मण्यांना तडे, भुरी, डाऊनी, गळ, कूज,  या समस्या निर्माण होऊ शकतात. लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकFarmerशेतकरी