शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

निफाड तालुक्यात रिमझिम पाऊस, द्राक्ष पंढरीत उत्पादक धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 11:42 IST

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज सकाळ पासून द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या निफाड तालुक्यातील बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे आता, अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.

सकाळपासूनच वातावरणात अमुलाग्र बदल झालेला बघायला मिळत आहे. एकीकडे थंडीचा घसरलेला पारा त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दुसरीकडे अचानक सकाळी नऊ वाजेच्या सुमारस पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्षउत्पादकांसह कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

या वातावरणात शेतमाल खराब होण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे द्राक्षांचे मनी तयार होण्याचा हा कालावधी असल्यामुळे खराब हवामानाचा विपरीत परिणाम द्राक्षांवर होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्राक्ष पंढरीत द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली होती. तेव्हा  अतोनात नुकसान झाले होते. द्राक्ष बागाची कूज आणि गळ मोठ्या प्रमाणावर झालेली होती. त्यातून शेतकरी सावरतो तोच पुन्हा एकदा  पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.  द्राक्ष आणि कांदा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काढणीला आलेला कांदा जमिनीत खराब होऊ शकतो तर द्राक्ष मण्यांना तडे, भुरी, डाऊनी, गळ, कूज,  या समस्या निर्माण होऊ शकतात. लाखो रुपये खर्च करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकFarmerशेतकरी