सलग दुसर्या दिवशीही पाऊस
By Admin | Updated: May 29, 2014 16:29 IST2014-05-28T23:50:38+5:302014-05-29T16:29:23+5:30
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह सलग दुसर्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.

सलग दुसर्या दिवशीही पाऊस
लोकमत चमू ल्ल नाशिक : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह सलग दुसर्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. सुरगाणा, पिळकोस, पाळे खुर्द, पेठ, देवळा, इगतपुरीसह इतर ठिकाणी पावसामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, तर शेतपिकांचेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इगतपुरीत रेल्वे सेवा ठप्प...इगतपुरी : घोटी-इगतपुरीदरम्यान झालेल्या जोरदार वार्यासह पावसामुळे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणार्या व नाशिककडे येणार्या रेल्वेगाड्या चार तास खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले, तर इगतपुरी शहरातून जाणार्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर विजेचा खांब कोसळल्याने दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. चार तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. घोटी येथे रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईहून नाशिकडे जाणारी एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, हबीबगंज एक्स्प्रेस, नंदिग्राम एक्स्प्रेस तसेच नाशिकहून मुंबईकडे जाणार्या वाराणसी एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस आदि गाड्या सुमारे दोन तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची एकाच धावपळ उडाली. रेल्वे उशिराने धावणार असल्याचे पाहून बर्याच प्रवाशांनी मिळेल त्या वाहनांने जाणे पसंद केले. आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यात जोरदार वादळीवार्यासह नांदगाव, फागूळगाव, गावढा, पिंपरी, मानवेढा, बोरली, टाके घोटी, तळेगाव आदि गावामध्ये घरांचे पत्रे व कौल उडाले. (वार्ताहर)पेठला अनाथ आश्रमाचे नुकसानपेठ : शहर व परिसरात सलग दुसर्या दिवशी वादळी पावसाने तडाखा दिला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे. जुनी झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ कापूरझिरा येथील सुशीला अलबाड यांच्या अनाथ आश्रमच्या इमारतीचे पत्रे ऊडून गेले, तर जांभळीच्या झाडानजीकचा वीजेचा पोल पडल्याने त्यखाली मोटारसायकल चक्काचूर झाली़ बाजारपट्टीतील अतूल भालेराव यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून मारूती मंदिरासमोरील आंब्याचे झाड पडल्याने वीजेच्या तारा तुटल्या तर जवळपास्या खेड्यावर नागरिकांची पूर्ण वाताहत झाली़ दोन दिवसाच्या पावसात लाखोंचे नुकसान झाले असून जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे़ दरम्यान अचानक सुरू झालेल्या पावसाने वीजेचे पोल पडल्याने परिसरातील वीज पूरवठा पूर्णपणे खंडीत झाला तर झाडे पडल्याने तारा तूटल्याने संपूर्ण तालुकाच अंधारात सापडला आहे़त्र्यंबकला अवकाळी पावसाने नुकसान त्र्यंबकेश्वर : अवकाळी पावसाने दुसर्या दिवशीही हजेरी लावली. तथापि, वादळाने मात्र घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यात आजही अवकाळी पाऊस पडल्याने जातेगाव (हरसूल), रोहिले, देवगाव, हट्टीपाडा, डहाळेवाडी आदि अनेक भागांत पत्रे, कौले उडाली आहेत.दरम्यान, त्र्यंबक येथील मंदिराचे काम करीत असलेल्या कारागीर व मजुराचा वीज पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना मदत देण्याबाबत तहसीलदार नरेश बहिरम यांनी पुढील कार्यवाही केली आहे.