रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
By Admin | Updated: June 30, 2014 22:52 IST2014-06-30T01:15:51+5:302014-06-30T22:52:35+5:30
रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
येवला : येथील तहसीलदारांच्या पुढाकार आणि निर्धाराने अखेर ५० वर्षांपासूनचा रेंडाळगाव ते लभानतांडा रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला. ५० वर्षांपासूनची तुमची आपापसातील भांडसे अद्याप मिटली नाही. तुमच्या वादामुळे या गावातील सुमारे पुन्हा पुन्हा जर तुम्ही कागदावर आला, तर निर्णय घेणे अवघड आहे. मी येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून आलेला आहे. रस्त्यापासून वंचित ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मी माझी प्रशासकीय भूमिका बाजूला ठेवतो तुम्हीही तुमच्या बांध, वाट, हिस्स्यांचे कागदपत्र बाजूला ठेवा. समजुतीची व सहकार्याच्या भावनेने विचार करा. तुमच्याच गावातील शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, वृद्धांना, आजारी पेशंटसाठी तुम्ही रस्ता देणार आहात. या रस्त्याचा वाद मिटल्याशिवाय मी येथून जाणार नाही, अशी भूमिका घेऊन येवला तहसीलदार शरद मंडलिक यांनी दुपारी ४ ते संध्याकाळी ७.३0 वाजेपर्यंत प्रत्यक्ष स्थळी थांबून ग्रामस्थांसाठी वहिवाटी रस्ता जाणे येणेसाठी उपलब्ध करून दिला. मंडल अधिकारी अशोक पगारे, डी. व्ही. वाघ हे याप्रसंगी उपस्थित होते.
रेंडाळे, ता. येवला येथे कोळगाव खरवंडी रस्त्यावर रेंडाळागाव ते लभानतांडा या शिवरस्त्यावर शिवाजी कारभारी गरुड व अरुण कचरू अहेर या रस्त्यालगत शेतकऱ्यांमध्ये ५० वर्षांपासून वाद होता. सदरचे शेतकरी हक्क सांगत असल्याने दोन्ही बाजूंनी अतिक्रमण होऊन सदरचा रस्ता बंद झाला होता. शालेय विद्यार्थी, शेतकरी यांना हा रस्ता बंद झाल्याने दि. २८/१/१४ रोजी सुवर्ण जयंती राजस्व अभियाना अंतर्गत तत्कालीन नायब तहसीलदार विनायक थविल यांच्या उपस्थितीत मोकळा करण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक अॅड. माणिकराव शिंदे यांनी स्वखर्चाने २ दिवस जेसीबी मशीन उपलब्ध करून देऊन हा वाद मिटण्यासाठी मध्यस्थी केली होती. शेती मशागतीचे कामे सुरू झाल्यावर लगतच्या दोन्ही शेतकऱ्यांकडून हा रस्ता बंद करण्यात आल्यावर रेंडाळा ग्रामस्थांनी तहसीलदार येवला यांच्याकडे सामुदायिक तक्रार दाखल करून रस्ता मिळण्याची मागणी केली. रस्त्यापासून वंचित ग्रामस्थांची शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन प्रत्यक्षस्थळी दोन दिवसांत येण्याचे आश्वासन देऊन वादी प्रतिवादींना हजर राहण्याचे सूचित केले.