शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:57 IST

कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

ठळक मुद्देसंरक्षण क्षेत्र : आधी काम नाही आता वेतनाचा प्रश्न

नाशिक : कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.नाशिककरांनी (कै.) यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून पाठविल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेचा भाग म्हणून संरक्षण खात्याच्या अखत्यारितील एचएएलचा कारखाना नाशिक जिल्ह्णातील ओझर येथे दिला. १९६४ साली झालेल्या या कारखान्याला मिग २१ विमाने बनविण्यासाठी परवाना देण्यात आला होता. या एका कारखान्यामुळे नाशिकमध्ये कारखानदारी आली आणि औद्योगिक क्रांती झाली. परंतु आता एचएएलच्या नाशिक विभागाची अवस्था बिकट झाली आहे. एचएएलमध्ये मिगचे काम संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर सुखोईची बांधणी आणि देखभाल दुरुस्तीचेदेखील काम सुरू आहे. मात्र ते संपल्यानंतर एचएएलकडे दुसरे काम नाही. पूर्वी सात ते आठ हजार कामगार असलेल्या या कारखान्यात आता साडेतीन हजार कामगार शिल्लक आहेत. नवीन विमानाचे काम सुरू करायचे असेल तर आता त्याची तयारी सुरू झाले तर काही वर्षांत पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ शकते. पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची एचएएलमध्ये निर्मिती होईल, असे सांगितले जात होते. मात्र केंद्रातील सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत ते खासगीकरणातून करण्यास दिले आणि एचएएलच्या भवितव्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी एचएएलला वाऱ्यावर सोडणार नाही असे अनेकदा सांगितले मात्र अद्याप नवीन काम सुरू झाले नाही.सध्या गाजत असलेला प्रश्न कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात असून, वेतनकराराचा कालावधी कमी करणे तसेच तसेच अपुरे वेतन असे अनेक मुद्दे आहेत. ऐन निवडणुकीत कामगारांनी संप केला असला तरी तो केवळ नाशिकमध्येच नाही तर एचएएलच्या सर्वच कंपन्यांमध्ये तो आहे. मात्र, यानिमित्ताने कामगार क्षेत्रातील अन्यायाचा मुद्दा मांडण्याची संधी विरोधकांनी सोडलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली दखल...एचएएलचा प्रश्न गंभीर असून, त्याचा एकूणच कामगार क्षेत्रावर परिणाम होऊ शकत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी कामगार संघटनेला भेट तर दिलीच; परंतु गोदाकाठी झालेल्या सभेत एचएएलचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक