शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

निवडणूक रणांगणात गाजतोय एचएएलचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:57 IST

कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.

ठळक मुद्देसंरक्षण क्षेत्र : आधी काम नाही आता वेतनाचा प्रश्न

नाशिक : कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्यासमोर संकट ठाकले असल्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला होता. मात्र, आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कामगारांनी वेतनाच्या मुद्द्यावर काम बंद आंदोलन केल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे.नाशिककरांनी (कै.) यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून पाठविल्यानंतर त्यांनी कृतज्ञतेचा भाग म्हणून संरक्षण खात्याच्या अखत्यारितील एचएएलचा कारखाना नाशिक जिल्ह्णातील ओझर येथे दिला. १९६४ साली झालेल्या या कारखान्याला मिग २१ विमाने बनविण्यासाठी परवाना देण्यात आला होता. या एका कारखान्यामुळे नाशिकमध्ये कारखानदारी आली आणि औद्योगिक क्रांती झाली. परंतु आता एचएएलच्या नाशिक विभागाची अवस्था बिकट झाली आहे. एचएएलमध्ये मिगचे काम संपल्यानंतर देखभाल दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यानंतर सुखोईची बांधणी आणि देखभाल दुरुस्तीचेदेखील काम सुरू आहे. मात्र ते संपल्यानंतर एचएएलकडे दुसरे काम नाही. पूर्वी सात ते आठ हजार कामगार असलेल्या या कारखान्यात आता साडेतीन हजार कामगार शिल्लक आहेत. नवीन विमानाचे काम सुरू करायचे असेल तर आता त्याची तयारी सुरू झाले तर काही वर्षांत पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ शकते. पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची एचएएलमध्ये निर्मिती होईल, असे सांगितले जात होते. मात्र केंद्रातील सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत ते खासगीकरणातून करण्यास दिले आणि एचएएलच्या भवितव्याचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी एचएएलला वाऱ्यावर सोडणार नाही असे अनेकदा सांगितले मात्र अद्याप नवीन काम सुरू झाले नाही.सध्या गाजत असलेला प्रश्न कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात असून, वेतनकराराचा कालावधी कमी करणे तसेच तसेच अपुरे वेतन असे अनेक मुद्दे आहेत. ऐन निवडणुकीत कामगारांनी संप केला असला तरी तो केवळ नाशिकमध्येच नाही तर एचएएलच्या सर्वच कंपन्यांमध्ये तो आहे. मात्र, यानिमित्ताने कामगार क्षेत्रातील अन्यायाचा मुद्दा मांडण्याची संधी विरोधकांनी सोडलेला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली दखल...एचएएलचा प्रश्न गंभीर असून, त्याचा एकूणच कामगार क्षेत्रावर परिणाम होऊ शकत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी कामगार संघटनेला भेट तर दिलीच; परंतु गोदाकाठी झालेल्या सभेत एचएएलचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक