शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दिंडोरीत दंडात्मक कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:49 IST

दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तीन भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे.

ठळक मुद्दे मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत ४१०० रु पये दंड वसुल

दिंडोरी : शहरात कोरोना रु ग्ण सातत्याने वाढत असून एकूण रु ग्णसंख्या ११५ वर पोहचली आहे. नगरपंचायत प्रशासन शहरात वारंवार मास्क वापरावा सोशल डिस्टन्स पाळावे यासाठी सातत्याने प्रबोधन केले जात आहे. मात्र काही नागरिक बेफिकिरी दाखवत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने तीन भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाईला सुरवात केली आहे.गुरु वारी (दि.२४) गावातील ४१ नागरिकांवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत ४१०० रु पये दंड वसुल केला आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.दिंडोरी शहरात गेल्या महिन्यापर्यंत रु ग्णसंख्या कमी होती. मात्र या महिन्यात दररोज रु ग्णसंख्या वाढत आहे. नगरपंचायत प्रशासनाने दिंडोरीत सातत्याने गर्दी होऊ नये मास्क वापरावे याबाबत प्रबोधन केले. निर्धारित वेळेनंतर सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करत दुकाने सील केली. दर रविवारी शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली जात आहे. मात्र सद्या सर्व व्यवसाय अनलॉक झाल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. परिणामी रु ग्णसंख्या ही वाढली असून त्यात खाजगी डॉक्टर व्यापारीही पॉझीटिव्ह आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.ठिकठिकाणी प्रबोधनात्मक बॅनर लावण्यात आले असून दिवसभर दवंडीची गाडी फिरवत नागरिकांचे प्रबोधन सुरू ठेवले आहे. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करत त्याची प्रभावी अंमलबजावणी करत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात धडक मोहीम राबवत मास्क न वापरणाºयांवर तसेच दुकानांपुढे सोशयल डिस्टन्स नपाळणाºया ठरलेल्या वेळेत दुकाने बंद न करणाºया व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नगरपंचायतचे सर्व अधिकारी कर्मचारी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी व्यापार्यांनी काळजी घेत मास्क वापरावे सोसियल डिस्टन्स पाळावे सॅनिटायझरचा वापर करावा गर्दी करू नये शासनाचे नियम सूचनांचे काटेकोर पालन करावे व कोरोना विरु द्धच्या लढाईत सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले व सर्व नगरसेवकांनी केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या